राज्याचे स्टार्टअप धोरण जाहीर; फडणवीस सरकारने घेतले 7 मोठे मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यताधोरण आज 5 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आले असून लहान चिंचोऱ्या जमीनीसंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुष्ठरोगींच्या अनुदानात वाढ ते राज्य शासनाच्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा […]

अधिक वाचा..

सोशल मिडीयावर बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-यांना नेहरू नगर पोलीसांकडून अटक

भीम आर्मीकडून पोलीसांचे अभिनंदन मुंबई: महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लीम धर्मा विषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहणा-या राज्याबाहेरील दोन आरोपींना नैहरू नगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.दरम्यान झालेल्या या केरवाईबद्दल भीम आर्मीने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. परभणी येथील भन्ते सारीपुत्त यांनी जात बौध्द, धर्म बौध्द […]

अधिक वाचा..

भाजपचे प्रवक्ते पदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करू नये

सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती, ही नियुक्ती रद्द करावी; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार मुंबई: न्यायव्यवस्थेकडे जनता आशेने बघते. अलीकडे न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात झाली आहे.  2024 मध्ये त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला ,त्यांनी प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. प्रवक्ता म्हणून काम केलेल्या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून निवड करणे […]

अधिक वाचा..

शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी हाती बांधले घड्याळ; अजितदादा पवारांनी केले स्वागत…

लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले गेले पाहिजे; अजित पवार मुंबई: स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला बेरजेचे राजकारण शिकवले आणि ते आपण करतोय. जातीभेद, धर्म, पंथ न बाळगता एकत्र नांदण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले […]

अधिक वाचा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत उपकेंद्राकरिता सार्वजनिक विद्यापीठात प्रत्येक ठिकाणी पाच एकर जागा देण्यासंबंधी केलेली कार्यवाही तसेच ज्या ठिकाणी उपकेंद्राकरिता जागा मिळाली आहे त्याचे भाडे किंवा तत्सम धोरणासंबंधीचा सुधारित आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विविध प्रश्नाबाबत आयोजित […]

अधिक वाचा..

भाजपाचे पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?

मुंबई: लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या […]

अधिक वाचा..

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?

मुंबई: भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याच्या प्रसंगावधनामुळे फसला तरुणीवरील बलात्काराचा प्रसंग

पोलिसांच्या सतर्कतेने पिडीत तरुणी नातेवाईकांच्या स्वाधीन पुणे: उरुळीकांचन येथील शेतकऱ्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे नराधमाच्या तावडीत सापडलेल्या एका परप्रांतीय तरुणीची सुटका झाली आहे. तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न फसला असून ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) रेल्वे स्थानक परिसरातील तांबे वस्ती परिसरात सोमवारी (दि. 4) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धनंजय मारुती तांबे (रा. तांबेवस्ती, […]

अधिक वाचा..

आता या लाभार्थ्यांचे रेशन धान्य होणार बंद

मुंबई: चारचाकी वाहन असणारे, आयकर भरणाऱ्यांसह वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रेशनकार्डधारक लाभार्थीची जिल्हा पुरवठा विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे. राज्य सरकारकडून रेशन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. गरज नसताना मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य […]

अधिक वाचा..