मालवणी शौचालय सेप्टीक टँक दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना ₹ ९० लाखांची मदत

मुंबई: मागील वर्षी मालवणी, अंबोजवाडी येथील मनपा शौचालयाच्या सेप्टीक टँक मध्ये पडून खाजगी कामगार असलेल्या रामलगन केवट व त्यांचे दोन मुलगे विकास केवट, सुरज केवट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार अस्लम शेख यांनी राज्यसरकार व महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून आधी ₹ ३० लाख व शुक्रवारी ₹ ६० लाख असे एकूण ९० […]

अधिक वाचा..

या वर्षीपासून इयत्ता चौथी, पाचवी, सातवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार शिष्यवृत्तीची परीक्षा

सोलापूर: चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवी, आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आतापर्यंत चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, २०१६ […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या नेत्याला झटका; ‘त्या’ निर्णयाला 4 दिवसांतच स्थगिती

पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून evm मशीनबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता. मात्र, या विरोधात काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर उमेदवारांची […]

अधिक वाचा..

आमदार शशिकांत शिंदे समर्थक आक्रमक; कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या 

सातारा: कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही कल्पना न देता आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी बेकायदेशीररीत्या प्रवेश करून चौकशी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, जुजबी उत्तरे दिली जात […]

अधिक वाचा..

चिडलेल्या बायकोने नवऱ्यालाच संपवल; पहा धक्कादायक कारण

दिल्ली: दिल्लीमध्ये एका २९ वर्षीय महिलेला नवऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. या महिलेने आपल्या ३२ वर्षीय नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर या घटनेला तिने आत्महत्या असल्याचे सांगत बनाव रचला. ही घटना रविवारी संध्याकाळी दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली. नवरा शरीरसुख देऊन खूश करू शकत नव्हता त्यामुळे या महिलेने त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून उघड […]

अधिक वाचा..

मराठी माणसाचा अपमान; पण महाराष्ट्रातील ४५ खासदार गप्प का

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता […]

अधिक वाचा..

संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार

पंढरपूर येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्काराने शिंदे यांचा सन्मान पंढरपूर: नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणं दिले.ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांच्या रचना या […]

अधिक वाचा..

उच्च न्यायालयाचा निर्णय! धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच

मुंबई: तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय […]

अधिक वाचा..

लेकाच्या मृत्यूबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले

नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा दुर्वासा अडीच वर्षांचा असताना गेला. डोळ्यांच्या समस्येमुळे मुलाचं जगणं कठीण होतं, तरी नाना पाटेकर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिले. अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्ट बोलताना पहायला मिळतात. यावेळी त्यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा..

हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट 

मुंबई: जल जीवन मिशनचे काम करूनही तब्बल 1.40 लाख रुपयांचे थकीत बील न मिळाल्याने सांगलीतील युवा कंत्राटदार हर्षल पाटील याने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. हर्षलच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षांकडून सरकारला टार्गेट केले जात आहे. मात्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात मोठी माहिती दिली आहे. ‘जो आरोप केला जातो आहे की हर्षल […]

अधिक वाचा..