आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढणार, तुम्हाला सुद्धा आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची सुवर्णसंधी

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना ‘शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे’ यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत निवेदन करुन घोषणा केली. महत्वाच्या घोषणा  […]

अधिक वाचा..

कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले, ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज; हर्षवर्धन सपकाळ

खाजगीकरणामुळे कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या  मुंबई: कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे […]

अधिक वाचा..

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचा ठराव मंजुर

बुध्दगया मंदिर कायदा बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे नवीदिल्ली: बुध्दगया मंदिर कायदा 1949 बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौध्दांच्या ताब्यात द्यावे असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दिली. महाबोधी महाविहार मुक्ती […]

अधिक वाचा..

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज, RTO मध्ये न जाता 7 दिवसांत मिळेल लायसन्स

मुंबई: जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्सनंतर पर्मनंट लायसन्स मिळते. जर तुम्हाला लर्निंग लायसन्सची प्रक्रिया माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (LLR) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 1) sarathi.parivahan.gov.in च्या […]

अधिक वाचा..

एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक

दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते […]

अधिक वाचा..

हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे अधिवेशन

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. “हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे होते, या अधिवेशनात बाकी काहीच नव्हते,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले. अधिवेशनाचे संपल्यानंतर विधानभवनातील विधानसभेच्या पत्रकार दालनात विरोधी […]

अधिक वाचा..

कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी

मुंबई: राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संविधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते परंतु दुर्देवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपाच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार कायदा सुव्यवस्था […]

अधिक वाचा..

तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. उबाठा गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

दौंडमध्ये ७ ते ८ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने खळबळ

मुंबई: पुणे जिल्ह्यातील दौंड येथील गोपाळवाडी परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्येच्या संभाव्य प्रकरणांकडे लक्ष वेधले असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही […]

अधिक वाचा..

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? अहवालाची लपवाछपवी का

केस गळतीवरील पद्मश्री हिम्मतराव बावस्करांच्या संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का मुंबई: बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर […]

अधिक वाचा..