खासगी विकासक व ट्रस्टमधील करार सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

जी.जी. भाॅय ट्रस्ट जमीन लीज प्रकरण मुंबई: जी.जी. भाॅय ट्रस्ट आणि खाजगी विकासक यांच्यातील करार सात दिवसांत शासनाला सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मुंबईतील माझगावमधील लीज जमिनी संबंधित आज मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी हे आदेश देण्यात आले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन २०२३ मध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या अनुषंगाने […]

अधिक वाचा..

संविधान हा लोकशाही मूल्यांचा पाया; डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेत संविधान गौरव चर्चा मुंबई: भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर विशेष चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक प्रवासावर, महिलांच्या योगदानावर आणि सध्याच्या परिस्थितीतील अंमलबजावणीवर सखोल विवेचन केले. सभापती राम शिंदे यांनी संविधानाच्या अमृत […]

अधिक वाचा..

संभाजीनगरसह या तीन जिल्ह्यांत १.१० लाख पीक विमा अर्ज रद्द

मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द छत्रपती संभाजीनगर: १४८ गंगापूर: १०४ कन्नड: ६८ खुलताबाद: ४५७ पैठण: ४९० फुलंब्री: २०५ सिल्लोड: ४१५ सोयगाव: ३२८ वैजापूर: २६४ जालना जिल्ह्यात ११,२३९ […]

अधिक वाचा..

वाहतुकीचे नियम मोडल्यास भरावा लागेल 10 पट अधिक दंड; जाणून घ्या दंडाची नवीन रक्कम

मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे. पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास पूर्वी: ₹100 दंड आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स […]

अधिक वाचा..

एनडीस आर्ट वर्ल्ड’चे संपूर्ण दायित्व प्रदान; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दायत्वपूर्ती सोहळा संपन्न

१०० दिवस कार्यक्रमातर्गत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा मुंबई: दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ (ND Studio) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला असून ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड’चे संपूर्ण दायित्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधानभवन येथे दायित्वपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी […]

अधिक वाचा..

मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेटींग

मुंबई: मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावे

मुंबई: येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक […]

अधिक वाचा..

राज्यातील कृषिक्षेत्राला प्रगतीची आश्वासक दिशा देण्यासाठी कृषी हॅकॅथॉन स्पर्धेच्या माध्यमातून नवकल्पक संशोधकांना संधी

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषि हॅकाथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. कृषी हॅकॅथॉन […]

अधिक वाचा..

OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि समाजघटकांविषयी अनादराची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात […]

अधिक वाचा..

कित्येक दुष्ट दुशासन आज माजले, स्त्री शक्तीला विवस्त्र केले, नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले

जयंतराव पाटील यांच्या रुपाने विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तोफ धडाडली मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण केले. यावेळी जयंतराव पाटील यांच्या रुपाने विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तोफ चांगलीच धडाडली. आपल्या भाषणात टोले, चिमटे, कोपरखळ्या आणि कवितांचा वापर करत […]

अधिक वाचा..