युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान…

जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया… मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा सुरुंग! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात दे धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादीतूनही इन्कमिंग मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबवलीमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील 200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश […]

अधिक वाचा..

सांस्कृतिक खात्यातील सांस्कृतिक ठेकेदारांचा बाजार कधी बंद होणार…

मुंबई: बऱ्याच वर्षानंतर राज्याला अनुभवी आणि एक अभ्यासू सांस्कृतिक कार्य मंत्री लाभले.मुंबईतील गिरणगावच्या संस्कृती पासून ज्यांचा सुरु झालेला जीवनप्रवास सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या कोकणांच्या मातीशी जोडला गेला.,असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी डिसेंबर 2024 साली सांस्कृतिक कार्य विभागाचा पदभार स्वीकारला. अन या विभागाला गती मिळाली. नुकताच राज्यात बाराशे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित […]

अधिक वाचा..

विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून वृद्धाची लाखोंची फसवणूक

संभाजीनगर: महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेमधील एक अत्यंत विश्वसनीय आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील. परंतु त्यांच्याच चेहऱ्याचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या सहाय्याने गैरवापर करूनछत्रपती संभाजीनगर येथील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांनी गंडवण्यात आलं, ही घटना धक्कादायक आहे. घटना कशी घडली छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या […]

अधिक वाचा..

मानखुर्द महामार्गा लगतच्या रहिवाशांचे एस आर ए मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करावे; शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात सदर महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत. त्या जमिनीचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) च्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले. सह्याद्री मित्र मंडळ […]

अधिक वाचा..

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रसरकारकडे पत्राद्वारे मागणी

चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान… मुंबई: चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि परकीय गंगाजळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

अंगणवाडीत पोषण आहारात सापडल्या अळ्या

इतके वाईट आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत घाला, कारवाई करा, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी मुंबई: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार देण्यात येतात धाराशिव तालुक्यातील पाच शाळांमध्ये या बार मध्ये अळ्या सापडल्या. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी हे खेळणे आहे. FDA ने तपासणी […]

अधिक वाचा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमिनीवर भूमाफियांचा कब्जा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या जमिनीवर अनधिकृतपणे इमारत बांधणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा  मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेली मौजे तळवली, तालुका-कल्याण येथील जमीन भूमाफियांनी बळकावली व तिथे ‘तनिष्का रेसिडेन्सी’ नावाने ७ मजली इमारत उभी केली. आज याच मुद्द्यावरुन विधानसभेत आक्रमक होत अशा भूमाफियांना तडीपार करण्याची व त्यांच्यावर एमपीडीए […]

अधिक वाचा..

त्यांनी भाजपऐवजी स्ट्राँग केलं स्वतःचं नेटवर्क

सिंधुदुर्ग: भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच सुत्रे स्वीकारली. आता संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर असणार आहे. नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाला कशी दिशा देतात? हे बघणे आता महत्वाचे असणार आहे. पण महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यापूर्वी चव्हाण यांच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते त्यांचा स्वतःचाच सिंधुदुर्ग […]

अधिक वाचा..

सकाळी अर्ज, दुपारी बैठक आणि संध्याकाळी हातात परवाना

मुंबई: मींधे गटाचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांना विमानापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाने मिळाले. सकाळी अर्ज केला, दुपारी बैठक झाली आणि संध्याकाळी पुढली सारी प्रोसेस अतिशय सुपर-डुपर फास्ट पार पडली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केला. रोहित पवार यांनी आज विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार […]

अधिक वाचा..