परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई: वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. डॉ. […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…

पुणेः पुणे शहरासह पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शासनाच्या माध्यमातून रस्ते विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड प्रकल्प. खरे तर पुणे शहरात दोन रिंग रोड तयार होणार आहेत एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे तर […]

अधिक वाचा..

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करणार, मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?

मुंबई: राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा प्रश्न मला पडत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार ‘महाराष्ट्र महोत्सव’; महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पुर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध फ्रंटल व सेल राज्यप्रमुखांची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतली व पक्षाच्या प्रदेश फ्रंटल व सेलच्या राज्यप्रमुखांना महाराष्ट्र महोत्सवाचा कार्यक्रम दिला. […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो. कोरटकरचे, आयपीएस अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी जवळचे हितसंबंध होते, त्याला पळून जाण्यात पोलिसांचीच फूस असावी असा संशय व्यक्त करून कोरटकर पळून जात असताना सरकार काय करत होते ? गृहविभाग […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमीन, मालमत्ता विकण्याचा अधिकार कोणाला असतो, नियम, कायदा काय सांगतो

मुंबई: वडिलोपार्जित संपत्तीची विक्री करताना अनेक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. जर योग्य नियम पाळले नाहीत, तर ती विक्री अवैध ठरू शकते आणि भविष्यात वाद होऊ शकतात. त्यामुळे, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कोणाचा हक्क असतो आणि ती विकण्यासाठी कोणत्या अटींचे पालन करावे लागते, हे समजून घेणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय? वडिलोपार्जित संपत्ती ही पूर्वजांकडून […]

अधिक वाचा..

निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावले

मुंबई: भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून श्री ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासोबत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला बीएलओ स्तरापर्यंत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर त्यांना सुखद अनुभव देण्यासंदर्भात ठोस पावले उचलली आहेत. मुख्य भागधारक […]

अधिक वाचा..

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील निकालाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठाम भूमिका घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील वादग्रस्त निकालाची स्वतःहून दखल घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरल यांच्याकडे केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मा. न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दिलेल्या या निर्णयात आरोपींविरुद्ध जबरदस्तीने पीडितेला पकडणे, तिच्या पायजम्याची नाडी खेचणे आणि तिला […]

अधिक वाचा..

वांद्रे (पू) जागेवर राज्याचे नविन महा पुराभिलेख भवन बांधणार

मुंबई: वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर राज्याचे नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आश‍िष शेलार यांनी केली. राज्याच्या स्वतंत्र वस्तू संग्रहालय व कला भवनाची बीकेसी मध्ये उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली होती त्यानंतर आज त्यांनी आणखी एक मोठी घोषणा विधानसभेत केली. मंत्री […]

अधिक वाचा..

लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे 

मुंबई: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस नियोजन करावे. लातूर महानगरपालिकेने जलसाठ्यांचा आढावा घेत पाणीवापराचे नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा. पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. विधानभवनात लातूर महानगरपालिका कचरा, वाहतुक व्यवस्था, […]

अधिक वाचा..