विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा

मुंबई: महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील […]

अधिक वाचा..

माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना मजबूत, उबाठाला खिंडार

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश मुंबई: अमरावतीचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह माजी महापौर, ३ माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्ष नेता आणि ७ माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत […]

अधिक वाचा..

सार्वजनिक विद्यापीठे,अशासकीय महाविद्यालयां मधील रिक्त पदांच्या भरतीस वेग येणार

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती रिक्त पदांच्या भरतीस सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला. […]

अधिक वाचा..

नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी; आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला. आपला जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नविन अधिकार दिले आहेत का ? असा प्रश्नांचा भडीमारही आमदार पाटील यांनी केला. […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिका ‘एल’ विभागातील नागरी समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जोरदार मोर्चा

मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी भव्य व शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला.या विभागात सुमारे ९ ते ११ लाख नागरिक राहतात, परंतु आजही त्यांच्या जीवनात गटारसफाई, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण व सुरक्षित रस्ते या मुलभूत […]

अधिक वाचा..

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी मुंबई: पुणे – नाशिक आणि नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी […]

अधिक वाचा..

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा फतवा रेशिमबागेतून आला, मराठी भाषा गिळंकृत करण्याचा प्रयत्न

मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचे वक्तव्य, भाजपाला देशात भाषेच्या नावाने संघर्ष निर्माण करायचा आहे मुंबई: हिंदी, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र ही ज्यांची संकल्पना आहे तेच लोक पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या पाठीमागे आहेत. या मानसिकतेचे लोकच बहुजनांच्या ज्ञानाची मराठी भाषा व तिचा संघर्ष गिळू पहात आहेत. हा जुनाच संघर्ष असून हिंदीच्या निमित्ताने तो पुन्हा […]

अधिक वाचा..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु

संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी *ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू* झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे कराल अर्ज अधिकृत वेबसाइट:https://navodaya.gov.in थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/नवस शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी किंवा […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर; आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन 

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर दिविजा वृद्धाश्रमात साकार केले. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकारी वेशभूषा परिधान केली. यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानदेव, सोपान, निवृत्तीनाथ व मुक्ताई यांचा पेहराव केला तर इतर आजी आजोबांनी वारकरी पेहराव घातल्यामुळे आश्रमातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रविवारी […]

अधिक वाचा..

हा केवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचा हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार आहे

संघ भाजपाने वाढवलेल्या विषवल्लीला आता सुरज शुक्ला सारखी फळे लागली आहेत मुंबई: पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला […]

अधिक वाचा..