महाराष्ट्रातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा भाजपा युती सरकारचा प्रयत्न

मुंबई: महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना आहे, अशा मंत्र्यांमुळे […]

अधिक वाचा..

महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे; डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या अंतर्गत ६९ व्या सत्रानिमित्त ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन मुंबई: “शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि महिला व बालकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्याय व्यवस्थेत ठोस सुधारणा आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जागतिक महिला आयोगाच्या ६९ व्या सत्रानिमित्त […]

अधिक वाचा..

‘सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण

सौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन कार्यरत आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण […]

अधिक वाचा..

सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फूटाखालील जमीन सरकारची? जाणून घ्या काय म्हणतो कायदा

मुंबई: आपल्या जमिनीच्या आत काही मौल्यवान वस्तू सापडल्या तर त्या आपल्याच असतील का? नाही. भारतीय कायद्यांनुसार, जमिनीत सापडलेला कोणताही खजिना हा सरकारचा असतो. जाणून घ्या यासंदर्भातील कायदा. भारतीय निखात-निधी अधिनियम, 1878′ काय सांगतो? ‘Indian Treasure-Trove Act, 1878’ (Amending Act XII of 1891) हा कायदा भारतात लागू आहे. यातील ‘Treasure Trove’ हा शब्द फ्रेंच भाषेतील असून, […]

अधिक वाचा..

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी 

ठाणे: माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित भव्य दिव्य “केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025” च्या *अंतिम सामन्याच्या* प्रसंगी ते बोलत होते. […]

अधिक वाचा..

कैलास नागरेंना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा

बुलढाण्यातील तरुण शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा युती सरकारने घेतलेला बळी; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे

वैद्यक क्षेत्रातील संशोधक दांपत्य डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांना २०२४ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान मुंबई: जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ म्हणून लोकांना आरोग्य सक्षम करणे शासन आणि समाजाचे प्राथम्य असले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची तातडीने गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यक क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. अभय […]

अधिक वाचा..

शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी ३०-४० लाख रुपयांचा निधी द्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची विधानसभेत मागणी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काल वीधानसभेत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी वाढवून देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. स्वराज्याचरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे येत्या २९ मार्च २०२५ […]

अधिक वाचा..

रोहयो मजूरांची होळी आनंददायी होण्याचा मार्ग खुला

मुंबई: पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील चार हजार मजूर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधीत मजूरांना त्यांची 45 कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत करण्यात येईल, अशी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेने […]

अधिक वाचा..

अत्यवस्थ रुग्ण २४ तास उपचाराविना, शीव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई: खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत शीव रुग्णालयातील ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने सोलापूरहून गंभीर अवस्थेत आणलेल्या ८७ वर्षीय रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ तास स्ट्रेचरवरच असलेला रुग्ण उपचाराची वाट पाहत होता. उपचारासाठी नातेवाईक विनवण्या करीत होते, मात्र डॉक्टराला पाझर फुटला नाही. अखेर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी […]

अधिक वाचा..