पोलिसांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात उठवला आवाज

मुंबई: समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डिजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात आवाज उठविला. पोलिसांच्या ड्युटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, […]

अधिक वाचा..

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा; प्रयोगशील नाट्य निर्माते राहुल भंडारे

डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या १२ नाटकांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न जळगाव: व्यावसायिक असो वा हौशी नाटक त्यासाठी मुळात संहिता असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत चांगल्या नाट्यसंहितांची वाणवा असून, जुन्या जाणत्या लेखकांनी केलेले नाट्यलेखन समोर आल्यास, नवलेखकांना त्या सर्जनशीलतेचा वारसा अनुभवता येईल. या वारश्यातूनच उद्याच्या पिढीचे चांगले लेखक तयार होतील, असे प्रतिपादन अद्वैत थिएटर्सचे निर्माते व रंगकर्मी राहुल […]

अधिक वाचा..

आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी; अजित पवार मुंबई: आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये […]

अधिक वाचा..

राज्यात वीज पडून मृत झालेल्या शेतकरी, शेतमजूरांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी 

मुंबई: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा […]

अधिक वाचा..

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी  मुंबई: वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून, पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तातडीने सखोल चौकशी करून […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथे शिवपानंद रस्त्या संदर्भात बैठक संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून सरदवाडी येथे शिवपानंद पूर्वापार शेतवहिवाटीचा रस्त्या संदर्भात सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला मा महाराष्ट्र राज्य शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे यांनी मार्गदर्शन केले. शिवपानंद रस्ते ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून शेवटच्या […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का

मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदती ही सरकार देत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. […]

अधिक वाचा..

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकार

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत साधून त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान […]

अधिक वाचा..

पंढरपूर विकास आराखड्यासाठी 15 कोटी मंजूर केल्याबद्दल डॉ. नीलम गो-हे यांनी शासनाचे मानले आभार 

मुंबई: महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 जून 2025 च्या शासन निर्णया नुसार पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी 2025- 26 या वर्षांमध्ये 15 कोटी एवढा निधी वितरित केला आहे या निधीमधून पंढरपूर मंदिर विकास आराखडा अंतर्गत मंजूर कामावर वर होणारा खर्च करण्यासाठी मोठी संधी मिळालेली आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये राज्य शासनाने हा निधी वितरित केलेला असल्यामुळे मंदिराच्या विकास […]

अधिक वाचा..

राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्यांविरुद्ध १२ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाने दिनांक ११ जुलै २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय अधिस्वीकृती समिती तसेच नऊ विभागीय अधिस्वीकृती समित्यांची बेकायदेशीर व मनमानीपणे स्थापना करण्यात आली होती. या समित्यांच्या स्थापनेला आव्हान देत प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिका क्र. 10070/2023 वर ऑगस्ट व […]

अधिक वाचा..