पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा […]

अधिक वाचा..

एचएसआरपी नंबरप्लेटवरून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र अन…

मुंबई: वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]

अधिक वाचा..

चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता कार्यशाळांचे आयोजन करणार

मुंबई: गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा, निर्मात्यांसाठी निर्मिती कार्यशाळा, चित्रपट साक्षर रसिक तयार व्हावेत यासाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळा यांसह विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ‘चित्रांगण’ या बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत […]

अधिक वाचा..

तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठी डॉ. विनोद मोहितकर यांचा आयएसटीईकडून मानद फेलोशिपने सन्मान

मुंबई: तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेवून तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना २०२४ या वर्षाकरिता मानद फेलोशिप (Honorary Fellowship) हा सन्मान वित्त मंत्री अर्थ मंत्रालय पंजाब शासन,AICTEचे चेअरमन प्रा. डॉ. टी जी सितारामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानाचे श्रेय डॉ. मोहितकर यांनी उच्च व […]

अधिक वाचा..

शिवाजी महाराजांची बदनामी व अवमान करणाऱ्यांना राजाश्रय

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु मुंबई: हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार […]

अधिक वाचा..

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची ४ व ५ मार्च, २०२५ रोजी दोन दिवसांसाठी भारत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे परीषद आयोजित केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अध्यक्षतेखाली होणारी ही अशी पहिलीच परिषद आहे. मुख्य निवडणूक […]

अधिक वाचा..

अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता; नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब

अध्यापक निवड प्रक्रिया पारदर्शक,निःपक्ष राबविण्यासाठी गुणवत्ताधारित नवीन कार्यपद्धती जाहीर मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले , मा.राज्यपाल […]

अधिक वाचा..

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करावे; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा मुंबई: राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (security audit) करण्यात यावे.तसेच बसस्थानक व आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निर्लेखन बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला सुरक्षा रक्षक नेमणार    महिला प्रवाशांची […]

अधिक वाचा..

पर्यटक आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा व कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे

मुंबई: पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा मंदिर परिसराच्या विकासाची कामे […]

अधिक वाचा..

माजी आमदार सुभाष चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद व वेदनादायी आहे. सुभाष चव्हाण यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता हरपला आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..