विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी

मुंबई: प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम […]

अधिक वाचा..

राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद

छ. संभाजीनगरसह ‘या’ १५ जिल्ह्यात ३१ हजार कोटींची थकबाकी संभाजीनगर: महाराष्ट्रातील तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी सध्या बॅंकांचे ३१ हजार २५४ कोटी रुपयांचे कर्ज थकवून आहेत. यामुळे या शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे सध्या बंद झाले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. का वाढली थकबाकी कर्जमाफीची आशा: सरकारने विधानसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी आमदारकी व आयुष्यही देऊ मुंबई: भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी

विधानसभेच्या कामकाजावर पूर्ण दिवसासाठी टाकला बहिष्कार मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. […]

अधिक वाचा..

हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे: महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस श्री. पाटील यांच्यासह तहसिलदार रेवण लेंभे व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून […]

अधिक वाचा..

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन

मुंबई: विधानभवनातील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एकाच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या.महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील विधान भवन परिसरातील […]

अधिक वाचा..

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई: शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी काम करणार असल्याचे […]

अधिक वाचा..

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार; मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे 49 वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला जोर का धक्का…

संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ ठाणे: नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेश झालेल्यामध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक […]

अधिक वाचा..