गतिमान सरकार शेतकरी, विद्यार्थी, जनतेचे प्रश्न सोडविण्यास ठरले अकार्यक्षम

नागपूर: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला आलेलं अपयश , उद्योग विभागात राज्याचा घसरलेला क्रमांक, बनावट औषधे घोटाळा, जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था आदी प्रश्न सोडविण्यास गतिमान सरकार अकार्यक्षम ठरले आहे, अशा खरमरीत शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. देशात महाराष्ट्राचे उद्योगातील स्थान 13 व्या क्रमांकावर घसरले आहे. उद्यम योजनेत छोटे आणि लघु […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीक्षाभूमीला भेट

भगवान गौतम बुद्धाना वंदन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला केले विनम्र अभिवादन नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केले. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी, दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारच्या काळात गुंडाराज; महाराष्ट्रात फोफावलेल्या गुंडाराजचा अंत करा

मुंबई: परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा […]

अधिक वाचा..

भारत जोडो यात्रेत असामाजिक तत्वे होती तर कारवाई का केली नाही

नागपूर: विधानसभा निवडणुकीतील भाजपा युतीच्या विजयावर जनतेचा विश्वास बसलेला नाही. हे सरकार आपल्या मतांचे नसून निवडणुकीत काहीतरी घोटाळा झाला असल्याची जनतेची भावना आहे. ७६ लाख मते कशी वाढली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिले नाही पण राज्याचे मुख्यमंत्री मात्र मतदानप्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीच्या लोकांची वकिली करावी व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ; अंबादास दानवे

नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेशा व्यक्तीमत्त्वाची निवड विधान परिषदेचे सभापती करण्यावर सर्वांनी एकमत केलं. विरोधी पक्षानेही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.आपली कारकीर्द येणाऱ्या काळात चांगली व राज्याच्या प्रगतीची जावो, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी नवोनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिले. […]

अधिक वाचा..

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवार यांची पत्राद्वारे मागणी

मुंबई: केंद्रसरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार; आ. विजय वडेट्टीवार

राज्यपाल अभिभाषणावर बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका नागपूर: राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत, पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस होता, यावेळी चर्चेत सहभागी असताना […]

अधिक वाचा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा 

महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती मुंबई: भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला […]

अधिक वाचा..

नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील…

नागपूर: सन. २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या ” लालपरी ” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड […]

अधिक वाचा..

ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करावी

नागपूर: राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक गडकिल्ल्यांचे व पुरातत्व स्थळांच्या पावित्र्य भंगाच्या घटना समोर येतात . या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी मुबलक प्रमाणात कर्मचारी व पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारकडे केली. […]

अधिक वाचा..