टिळक नगर येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी 

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान टिळक नगर येथील युगप्रवर्तक बुद्ध विहाराच्या प्रांगणात नुकतेच संपन्न झाले. यावेळी लेखक, कवी अनंत धनसरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. धर्म,जात आणि राष्ट्र प्रेमाच्या खोट्या संकल्पनांच्या आधारे समाजात दुही माजवली जात आहे. आपले राष्ट्र भौगोलिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या टिकविण्याची फार मोठी जबाबदारी भारतीय समाजावर […]

अधिक वाचा..

जलसंधारण विभाग अधिक कार्यक्षम होणार; मंत्री संजय राठोड

मुंबई: मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जलसंधारण विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ आणि अनियमिततेत घट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य जलसंधारण महामंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री राठोड यांनी महामंडळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. शासनाने या उपाययोजनांना मान्यता दिली असून लवकरच मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीची स्थापना केली […]

अधिक वाचा..

घरकुलसाठी आता मिळणार ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान, एकूण अनुदान २.०९ लाख रुपयांवर

संभाजीनगर: गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण २ लाख ९ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये १५,००० रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत. आता कोणकोणते लाभ मिळणार PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000 मनरेगामधून 90 […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

मुंबई: एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य […]

अधिक वाचा..

MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा […]

अधिक वाचा..

मुंबईकरांच्या खिशावरचा डल्ला आम्ही सहन करणार नाही

मुंबई: मुंबईची शान आणि सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेली बेस्ट आज गंडांतराच्या उंबरठ्यावर उभी आहे. पालिकेच्या प्रशासनाने घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे बेस्टच्या भाड्यात थेट दुप्पट वाढ करण्यात आली आहे, आणि तीही केवळ काही मोजक्या कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी! मुंबईकरांचे खिसे रिकामे करायचे आणि ठराविक कंत्राटदारांची खाती भरायची, असा स्पष्ट अजेंडा पालिका प्रशासनाने उघडपणे स्वीकारल्याचे हे धक्कादायक उदाहरण आहे. […]

अधिक वाचा..

अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी रुग्णालयातील बोगस पदवीधारक डाॅक्टरला अटक

मुंबई: भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी या प्रथितयश रूग्णालयात सेवा देणा-या डाॅ.अतुल वानखेडे या बोगस ऑर्थोपेडीक पदवीधारक सर्जन डाॅक्टरला वरळी पोलीसांनी अटक करून त्याची रवानगी ऑर्थर कारागृहात केली आहे. डाॅ अतुल वानखेडे यांच्याकडे २०१० साली भारतातून बंद झालेल्या युनिवर्सिटी ऑफ सेशल्स या विद्यापीठाची केईएम रुग्णालयातून २०११ सालची ऑर्थोपिडीक एम एस ही […]

अधिक वाचा..

आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश सांगली: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथील समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, समाजकल्याण आयुक्त आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक ताबडतोब चालते व्हा

बुलढाणा: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा निर्वाणीचा इशाऱा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी […]

अधिक वाचा..

हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठ चे धरणे आंदोलन

मुंबई: संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी केला. पश्चिम बंगालमधील हिंदू […]

अधिक वाचा..