शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे 

मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन नागपूर: कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, धानाला बोनस मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. “कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, […]

अधिक वाचा..

सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिरचा “चाळीस वर्षे यशोगाथेची” कार्यक्रम

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने *चाळीस वर्षे यशोगाथेची* या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक वसंत यशवंत सावंत व संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने शैक्षणिक २०२४-२०२५ या वर्षात करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवारी […]

अधिक वाचा..

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्याची प्रक्रिया जाणून घ्या

रेशन कार्ड हे प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा कुटुंबाचा अधिकृत तपशील दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. आता तुमच्याकडे ऑनलाइन नाव जोडण्याचा सुलभ मार्ग आहे. ज्यामुळे वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतील. रेशन कार्डवर नाव का जोडावे 1) नवजात बाळासाठी: बाळाला सरकारी योजनांचा लाभ मिळावा (मोफत रेशन, शिष्यवृत्ती, इ.). 2) नवविवाहित महिलेसाठी: […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना सरकारच डबल गिफ्ट

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतला मोठा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत *दर महिन्याला ₹1,500* देण्यात येतात. महायुती सरकारची वचनपूर्ती महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹2,100 जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या योजनेसाठी पुढील […]

अधिक वाचा..

बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप, सरकारने उत्तर द्यावे

नागपूर: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची […]

अधिक वाचा..

ATM मधून काढता येणार PF चे पैसे; जाणून घ्या काय आहे EPFO योजना?

EPFO सदस्यांसाठी क्रांतिकारी सुविधा EPFO ने सदस्यांसाठी त्यांच्या PF (प्रॉव्हिडंट फंड) काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल आणला आहे. आता सदस्यांना एटीएममधून थेट पैसे काढण्याची सोय मिळणार आहे! या नव्या सुविधेमुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे जीवन आणखी सुलभ होणार आहे. EPFO च्या IT प्रणालीत मोठा बदल कामगार सचिव सुमिता डावरा यांच्या मते: जानेवारी २०२५ पासून, EPFO ची IT […]

अधिक वाचा..

बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा; अंबादास दानवे

नागपूर: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. या गंभीर हत्येत राज्य […]

अधिक वाचा..

..म्हणून सरकारने पळ काढू नये

नागपूर: नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारला […]

अधिक वाचा..

समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नागपूर: राज्यात गेली अडीच वर्ष महायुती सरकारने विकास आणि लोक कल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने जनतेने विश्वास टाकला आणि त्यामुळे महायुती सरकारची नवी इनिंग सुरु झाली आहे. राज्यातील जनतेचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. वीधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..
bride

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

सांगली : राज्यभरात अनेक ठिकाणी खोटे लग्न लावून गंडा घालणार्‍या टोळीने कर्नाटकमध्येही अनेकांना फसवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीतील पल्लवी मंदार कदम तथा परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिने धुळे, शिरूर आणि कर्नाटकातील निपाणी येथील अनेकांची खोटी लग्ने लावून फसवणूक केली आहे. सध्या फसवणूक करणार्‍या टोळीची कारागृहात रवानगी […]

अधिक वाचा..