प्राचार्य योगानंद काळे अनंतात विलीन, अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन नागपूर: नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांच्यावर अंबाझरी घाट येथे साश्रू नयनांनी रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत त्यांचे नेत्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी […]

अधिक वाचा..

हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक

मराठी भाषेसाठी महायुती सरकारने घेतले अनेक ऐतिहासिक निर्णय मुंबई: राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीबाबत केली जाणारी सर्व आंदोलने गैरसमजातून केली जात असून ती निरर्थक आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत […]

अधिक वाचा..

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही…

औरंगाबाद: शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी आणि २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले होते, तर काहींना मार्च २०१९ पर्यंत तीन किंवा पाच संधी देण्यात आल्या होत्या मात्र, मुदत देऊनही अनेकजण टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवार टीईटी (शिक्षक […]

अधिक वाचा..

देशात दडपशाहीचे राज्य, संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न, सर्व समाज भितीच्या सावटाखाली

आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही. राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच पुणे: देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींचा सन्मान, संघटनात्मक ताकद आणि सशक्त महिला नेतृत्व हेच शिवसेनेचे ब्रीद

सांगली: विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा सांगली जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना संघटनात्मक बांधिलकी, आरोग्य, सन्मान, आणि आर्थिक स्वावलंबन याविषयी प्रबोधन करत विविध योजनांची माहिती दिली. “महिलांना दिलेले वचन […]

अधिक वाचा..

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव, हिंदी भाषेची सक्ती रद्द करा

मुंबई: मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: आज पुण्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ. गोऱ्हे यांनी विविध योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. “शिवसैनिकांनी आता सत्तेत असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे,” असा ठाम संदेश डॉ. […]

अधिक वाचा..

जनतेला फसवणा-या महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष लढाई तीव्र करणार

मुंबई: केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शाह अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा […]

अधिक वाचा..

खासगी क्लास घेतल्यास शिक्षकांवर होणार कारवाई

शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचा कडक इशारा औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आता खासगी कोचिंग क्लासेस घेण्यास किंवा त्यात भाग घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी शिक्षकांवर थेट कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठोर निर्णयाची आवश्यकता का शाळेतील कामकाजानंतर शिक्षक खासगी शिकवण्या घेतात, ज्यामुळे वर्गातील लक्ष […]

अधिक वाचा..