तृतीयपंथीयांचे आयुष्य सुकर व्हावे; रुपाली चाकणकर

राज्यात प्रथमच रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॅार्ड, राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेला यश मुंबई: समाजात स्त्री- पुरुष यांना मिळणारे अधिकार, मान तृतीयपंथी व्यक्तींना ही मिळायला हवे. त्यांचे जगणे सुकर व्हायला हवे, वेळप्रसंगी वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास रुग्णालयात ही त्यांना स्वतंत्र अस्तित्व असावे, त्यांची देखभाल केली जावी यासाठी तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष असावा या राज्य महिला आय़ोगाच्या संकल्पनेला यश […]

अधिक वाचा..

संस्कार भारती आणि ओरायन मॉल तर्फे INS विक्रांतची प्रतिकृती चंद्रपूर वनस्पती उद्यानास अर्पण

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीमुळे घेतला निर्णय मुंबई: संस्कार भारतीच्या संकल्पनेतून साकारलेली आणि पनवेलच्या ओरॉयन मॉल ने प्रायोजित केलेली आयएनएस विक्रांतची प्रतिकृती चंद्रपुरातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार संस्कार भारती आणि ओरायन मॉल यांनी आयएनएस विक्रांतची ही प्रतिकृती विसापूर […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील मुद्दे

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्णसेवेचे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे माजी खासदार दत्ता मेघे यांचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद महात्मा गांधी विनोबांच्या भूमीत रुग्णसेवेचे मोठे कार्य माजी खासदार दत्ता मेघे यांनी सुरू केले आहे त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा त्यांची दोन्ही मुले पुढे चालवीत आहेत रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असून या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील अनेक […]

अधिक वाचा..

तृतीयपंथांच्या उपचारांचा प्रश्न आता मिटला…

महाराष्‍ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष आजपासून कार्यान्वित मुंबई: तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा…

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा असून अर्थसंकल्पातून केवळ काल्पनिक परिणामांवर समाधान मानावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला मात्र यातून सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, असा हल्लाबोलही महेश तपासे यांनी […]

अधिक वाचा..

कर रुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली…

मुंबई: लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. सन २०१८ ते २०२२ […]

अधिक वाचा..

हा तर दगाबाज सरकारचा अर्थ संकल्प!

मुंबई: सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात शेतीच्या […]

अधिक वाचा..

मुष्टीयुद्धामध्ये देविकाचे पदक निश्चित…

खेलो इंडीया युथ गेम्स २०२२-२३ मुंबई: मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले आहे. ५२ किलो गटात तिने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा सहज पराभव केला. तिने प्रारंभापासूनच या लढतीत आपले वर्चस्व राखले होते. महाराष्ट्राच्या अभिषेक जांगिड, कुणाल घोरपडे यांनी आगेकूच कायम राखली. भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही…

मुंबई: या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली […]

अधिक वाचा..

अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ…

मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या […]

अधिक वाचा..