मुख्य बातम्या

Video : रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक; ६० तरुणांची सुटका, दोघे ताब्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत दुबईतील नामांकित कंपनी आली असुन त्या कंपनीत नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर करत प्रत्येकी १० हजार रुपये उकळत तब्बल ६० तरुणांना डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या फसवणूक झालेल्यांमध्ये ४३ तरुण व १७ तरुणी असून, या सर्वांना रांजणगाव गणपती येथील ‘सुखकर्ता लॉन्स’ येथे बंदिस्त करुन ठेवण्यात आले होते. संशयास्पद परिस्थितीत अडकलेल्या या तरुणांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत पोलिस प्रशासनाला माहिती दिली.

त्यानंतर झालेल्या कारवाईत ६० तरुणांची सुखरुप सुटका करण्यात आली. या प्रकरणी कलिम अवद बिनबाद आणि ज्ञानेश्वर धायदडक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या माध्यमातुन आणखी किती तरुणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरुन नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडविण्याचे प्रकार वाढत असून, बेरोजगार तरुणांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी व कठोर कायदेशीर कारवाई सुरु आहे.

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक

शिरुरमध्ये महिलेने घातला नोकरीच्या आमिषाने दहा लाखांना गंडा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

50 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

3 तास ago