रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत दुबईतील नामांकित कंपनी आली असुन त्या कंपनीत नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर करत प्रत्येकी १० हजार रुपये उकळत तब्बल ६० तरुणांना डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या फसवणूक झालेल्यांमध्ये ४३ तरुण व १७ तरुणी असून, या सर्वांना रांजणगाव गणपती येथील ‘सुखकर्ता लॉन्स’ येथे बंदिस्त करुन ठेवण्यात आले होते. संशयास्पद परिस्थितीत अडकलेल्या या तरुणांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत पोलिस प्रशासनाला माहिती दिली.
त्यानंतर झालेल्या कारवाईत ६० तरुणांची सुखरुप सुटका करण्यात आली. या प्रकरणी कलिम अवद बिनबाद आणि ज्ञानेश्वर धायदडक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या माध्यमातुन आणखी किती तरुणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरुन नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडविण्याचे प्रकार वाढत असून, बेरोजगार तरुणांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी व कठोर कायदेशीर कारवाई सुरु आहे.
रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…
रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…