मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ…

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर, जुन्नरसह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बिबट्याच्या उपद्रवाचे आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, प्रशासन पातळीवर मात्र पुरेसे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहे. वनविभागाच्या तोकड्या उपाययोजनांपुढे बिबट्या भारी ठरत असताना आणि गेल्या काही दिवसात जांबुत, पिंपरखेड सह तालुक्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

जुन्नर वनविभागांतर्गतही बिबट्याची समस्या आ वासून उभी असताना कामातील सुसूत्रतेबाबत सावळा गोंधळ दिसून येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या महिन्यात जांबुत व पिपंरखेड मध्ये निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील फलकेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक वासरू ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री (ता. १७ ) रोजी फलकेवाडी (कान्हूर मेसाई) शिवारात उघडकीस आली.

फलकेवाडी येथील शेतकरी बाळासाहेब चक्कर त्यांनी पशुधनासाठी गोठा तयार केला आहे. यामध्ये गाय व वासरू होत्या. सायंकाळी त्यांनी गाय व वासरे बांधून गेले. दरम्यान, रात्री 11.30 च्या सुमारास बिबट्याने आत प्रवेश करून हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला. सदर प्रकार कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने उघडकीस आला.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक नारायण राठोड, हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सध्या बिबटे जास्त आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे कमी अशी विरोधाभास आहे. त्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. एक बिबट्या पकडला तरी दुसऱ्या बिबट्याचे भय काही संपत नाही. तसेच बिबट्याचा माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. एकंदरीत यावर शासनाने प्रभावी मार्ग काढून शेतकऱ्यांना भयमुक्त करणे गरजेचे आहे.
– बाळासाहेब चक्कर, शेतकरी कान्हूर मेसाई.

 

Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला

चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…

बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…

शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…

बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

32 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

37 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

41 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

48 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago