शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात गणपती विसर्जनादरम्यान भीषण घटना, युवक भीमा नदीत बुडाला…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे हद्दीतील भीमाशेत येथे गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले (वय 30, रा. शिर्शी, ता. कंधार, जि. नांदेड, सध्या रा. भीमाशेत, तळेगाव ढमढेरे) हा युवक भीमा नदीत बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनासाठी नदीत उतरलेले भीमराव चेरले हे पाण्यात गेल्यानंतर वर आलेच नाहीत. नदीपात्र खोल असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी तसेच उपस्थित मंडळींनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिस आणि स्थानिक बचाव पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले असून, रात्री पहाटे पर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली आहे. परंतु, अद्याप चेरले यांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी जमले असून हळहळ व्यक्त करत आहेत. पुढील शोधकार्य पोलिस व बचाव पथकाच्या मार्फत सुरू आहे.

कुत्राही मैत्रीला जागला! बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिक पुरस्कार २०२५ वितरण

शिरूर नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; विसर्जनासाठी अनोखी दिशा 

शिरूर तालुक्यातील बापलेकाचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago