पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन मुंबई: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा २८ ऑगस्टला नांदेडच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती. मुंबई: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली असून ही समिती गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड […]

अधिक वाचा..

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक नकाते यांना नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी विशेष सेवा पदक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शौर्य, निष्ठा आणि सेवाभाव यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणत शिरूर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांनी संपूर्ण शिरूर तालुक्याचा अभिमान वाढवला आहे. शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय, धाडसी व प्रामाणिक सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी 2021 ते […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण भागात विद्यार्थ्यांची जनजागृती; सहजीवनाचा संदेश देत वनविभागाचा उपक्रम

शिरूर(अरुणकुमार मोटे): “बिबट हा शत्रू नाही, जंगलाचा अविभाज्य घटक आहे” या संदेशासह शिरूर वनविभागाने बिबट प्रवण भागातील टाकळीहाजी, पिंपरखेड, चांडोह, जांबुत येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होता. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात तेथील मुलांना, पालकांना बिबट्याच्या जीवनशैली, स्वभाव, सवयी तसेच मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी घ्यावयाच्या […]

अधिक वाचा..

बेट भागात शेतकऱ्यांच्या पशुधनावर चोरांचा डोळा; म्हैस व शेळ्यांची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील माळवाडी येथून मंगळवारी (दि. ५) रात्री चोरांनी दोन शेळ्यांची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अविनाश लक्ष्मण भाकरे (वय ३५), रा. माळवाडी, टाकळी हाजी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भाकरे यांच्या शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या असताना, चोरांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. चोरून नेलेल्या शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे […]

अधिक वाचा..

ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा ठाणे: ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या […]

अधिक वाचा..

नोकरी! राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोडसह ग्रामीण भागात 40 सहशिक्षकांची बंपर भरती

संभाजीनगर: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे पोषण, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करण्याची ही एक चांगली संधी आहे. या पदांसाठी अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रांची यादी (प्रत्येक कागदपत्राची स्वयं साक्षांकित (Self Attested) प्रत अनिवार्य […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना मदत करावी

मुंबई: मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही […]

अधिक वाचा..

वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई: राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात हरित लवादाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून, याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यातील अनेक […]

अधिक वाचा..

नागपूरच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत

काँग्रेसची समिती नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी, स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार मुंबई: नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे. नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त […]

अधिक वाचा..