पुण्यात काँग्रेस कार्यालयावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप

पुणे: पुण्यात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे मी सांगितले होते. त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला,” असा आरोप संबंधित नेत्याने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर चाल […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात राजकीय खळबळ! शिंदे गटात राजीनामा, भाजपात गटबाजी, ठाकरे गटात निलंबनाची टांगती तलवार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

भाजपाकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार

वर्धा: “आम्हाला भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही,” असे ठाम प्रतिपादन काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. माझ्या वक्तव्याची जाणीवपूर्वक मोडतोड करून राज्यात हिंदू-मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. टिपू सुलतानच्या मुद्द्यावर वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. सर्व महामानवांचे फोटो […]

अधिक वाचा..

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उबाठा)ला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही मुंबई: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी […]

अधिक वाचा..

भाजपामुळे शिंदे गटाला मोठा फटका? पराभवानंतर ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा

पुणे: राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणुकीतील निकाल, रत्नागिरीतील ठाकरे गटाचा पराभव, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य आणि मुंबई महापालिकेतील महापौर निवड या सर्व घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात शिंदे गटाला अपेक्षाभंग; भाजपामुळे फटका? पुणे जिल्ह्यात एक खासदार आणि एका अपक्षासह दोन आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा […]

अधिक वाचा..

पुण्यात भाजपची धडक कारवाई; ६९ बंडखोर कार्यकर्त्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पुण्यात भारतीय जनता पक्षाकडून मोठी संघटनात्मक कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या तब्बल ६९ कार्यकर्त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून संबंधित सर्वांचे प्राथमिक सदस्यत्व पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. बंडखोरी भोवली पुणे महानगरपालिका […]

अधिक वाचा..

बापू पठारेंची पाचही बोटं तुपात! एकाच कुटुंबात तीन पक्षांचे झेंडे

मुलगा-सून भाजपचे, मुली ZP मध्ये विजयी पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील राजकीय समीकरणांनी राज्याच्या राजकारणात नवा ‘पठारे पॅटर्न’ तयार केला आहे. एकाच घरातून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी निवडून आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बापूसाहेब पठारे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे कल स्पष्ट; भाजप आघाडीवर

सोलापुरात दिग्गजांच्या नातेवाईकांत रंगली चुरशीची लढत सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ७५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना ४१, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, काँग्रेस २२, ठाकरे गट १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निकाल LIVE: राष्ट्रवादीचा पहिला विजय,  भाजप-शिंदे गटाची राज्यात आघाडी

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता ईव्हीएममधील आकडे समोर येत आहेत. या निकालांमध्ये माढा तालुक्यातून पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे. माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही […]

अधिक वाचा..