जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे कल स्पष्ट; भाजप आघाडीवर

सोलापुरात दिग्गजांच्या नातेवाईकांत रंगली चुरशीची लढत सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ७५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना ४१, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, काँग्रेस २२, ठाकरे गट १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निकाल LIVE: राष्ट्रवादीचा पहिला विजय,  भाजप-शिंदे गटाची राज्यात आघाडी

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता ईव्हीएममधील आकडे समोर येत आहेत. या निकालांमध्ये माढा तालुक्यातून पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे. माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी तब्बल 7438 उमेदवारांनी आपलं राजकीय भवितव्य आजमावलं. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचं […]

अधिक वाचा..

भाजप–शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागांचा अंदाज;

दुःखाच्या वातावरणातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा पाठिंबा मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर चा एक्झिट पोल समोर आला असून, त्यानुसार भाजप आणि शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या शोकाकुल वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली; तटकरे यांच्या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकीकडे सत्तास्थैर्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होत असतानाच, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विलीनीकरणास […]

अधिक वाचा..

पिंपरी-चिंचवडच्या २७व्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे बिनविरोध

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २७व्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली. सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे महापौरपदीही बिनविरोध निवडून येत त्यांनी एक नवी परंपरा कायम ठेवली आहे. १५ ऑगस्ट १९८४ रोजी भोसरी येथे जन्मलेले ४१ वर्षीय रवि लांडगे हे डी. फार्मसी पदवीधारक असून शेती, वाचन आणि खेळाची […]

अधिक वाचा..

मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत अण्णामलाई; निवडणूक जबाबदाऱ्या सोडल्याने भाजपमध्ये खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले भाजप नेते के. अण्णामलाई पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अण्णामलाई यांनी निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या सोडल्याची घोषणा केल्याने राज्य भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून प्रचारासाठी तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. […]

अधिक वाचा..

अमरावती महापालिकेत भाजपचा डावपेच! राष्ट्रवादीला सोबत घेऊन राणा दाम्पत्याला थेट संदेश

अमरावती: महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने संख्याबळ जुळवताना युवा स्वाभिमानला सोबत घेतले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)लाही युतीत सहभागी करून घेत राजकीय चेकमेट खेळी खेळली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसोबत राहून विरोधात काम केल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी ‘महापौर भाजपचाच’ असा प्रचार निवडणुकीनंतर राबविणाऱ्या युवा स्वाभिमानला भाजपने त्यांच्या शैलीतच उत्तर दिले आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत […]

अधिक वाचा..

गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित! धनदांडग्यांना लाभ नाही; चंद्रशेखर बावनकुळे

धाराशिव: राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे शेतात राबूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले […]

अधिक वाचा..

राज्यसभेत भावनिक क्षण! भाजप खासदार सदानंदन मास्टर यांनी सभागृहात कृत्रिम पाय ठेवत मांडली राजकीय हिंसेची वेदना

नवी दिल्ली: सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना एक अभूतपूर्व आणि भावूक घटना घडली. भाजपचे खासदार सी. सदानंदन मास्टर यांनी आपल्या भाषणादरम्यान चक्क आपला कृत्रिम पाय काढून सभागृहातील बाकावर ठेवला. त्यांच्या या कृतीमुळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला, तर नंतर वातावरण अत्यंत भावूक झाले.लोकशाहीचा खरा चेहरा देशासमोर मांडण्यासाठी आपण हे पाऊल […]

अधिक वाचा..