बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी […]

अधिक वाचा..

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात प्रभावीपणे राबवणार

मुंबई: शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके “हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभिनयाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु! अर्थात , हे अभियान केवळ एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक ” लोकचळवळ ” करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते कुर्ला […]

अधिक वाचा..

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’राबविणार…

मुंबई: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी) पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ […]

अधिक वाचा..

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. हामहीम राष्ट्रपती, […]

अधिक वाचा..

मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस उद्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार 

मुंबई: काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली, यात महागाई व बेरोजगारी दूर करण्यातील महायुतीचे अपयश उघड केले आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसने ‘ आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत सरकारवर आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवर थेट प्रहार करण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलपासून गहू-तांदुळासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्रातील सामान्य […]

अधिक वाचा..

हुमणी नियंत्रण मोहिमेत ग्रामपंचायत डिंग्रजवाडी च्या पुढाकाराने प्रकाश सापळे साहित्याचे मोफत वाटप 

शिरूर: डिंग्रजवाडी (ता. शिरूर) महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत डिंग्रजवाडी यांच्या पुढाकाराने हुमणी नियंत्रण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. नियंत्रणासाठी पाऊस झाल्यानंतर बाहेर पडणारे हुमणीचे भुंगेरे प्रकाश सापळे लावून त्यात पकडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून हुमणी अळीचा बंदोबस्त होण्यास मदत होते. डिंग्रजवाडी, कोरेगाव भीमा, धानोरे, वढू या नदीकाठी […]

अधिक वाचा..

‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’ अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घोषणा

दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी):  देशभरातील खेळासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे खचलेले मनोबल सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंशी राष्ट्रवादी काँग्रेस संवाद साधणार असून ‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’ या अभियानाची सुरुवात करत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केली. या […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महाराजस्व अभियानात तब्बल ४४५ नोदींचे निर्गतीकरण

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांनी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी महाराजस्व अभियान राबविणेचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी १ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत. याकरीता तहसिल व मंडळ […]

अधिक वाचा..

शेत, पाणंद व शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी मिशनमोडवर विशेष अभियान राबवण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत […]

अधिक वाचा..