मुलींना १००% तर मुलांना ५०% फी माफी; नियम मोडणाऱ्या कॉलेजांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय लागू केला आहे. या निर्णयानुसार मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना ५० टक्के शुल्क माफी देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना स्पष्ट इशारा दिला की, शासनाच्या निर्णयानंतरही जर एखादे […]

अधिक वाचा..

समाज कार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालय समाज कल्याण विभागाकडून सन 2024 मध्ये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाल्याने […]

अधिक वाचा..

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहायक प्राध्यापक पदभरतीला मान्यता

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या […]

अधिक वाचा..

पुण्यात सोमवारी काही रस्ते बंद, काही शाळा-कॉलेजेसना सुट्टी

2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पुणे: शालेय विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे सोमवारी (दि. 19 जानेवारी) पुणे शहरातील काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांमधील शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्थांना एका दिवसाची […]

अधिक वाचा..

महाविद्यालयांत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे आयोजन; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनएसएस बाबत बैठक घेण्यात आली.या बैठकीस उच्च […]

अधिक वाचा..

शाळा अन् महाविद्यालयांना दणका! मनमानी शुल्कवाढीला लागणार ब्रेक

मुंबई: राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या गोष्टी बंद करून कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली सामायिक शिकवणीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारांवर कायदेशीर कारवाई होण्याची चिन्हे […]

अधिक वाचा..

सार्वजनिक विद्यापीठे,अशासकीय महाविद्यालयां मधील रिक्त पदांच्या भरतीस वेग येणार

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती रिक्त पदांच्या भरतीस सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला. […]

अधिक वाचा..

महाविद्यालयातील तसेच शाळेतील तरुणींना कोणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे

बीड: धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या साक्षी कांबळे प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बीडमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेत त्यांना मानसिक आधार दिला, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा विश्वास दिला. या प्रकरणातील आरोपीस जामीन मिळाल्याने कुटुंबात संतापाची लाट उसळली आहे. […]

अधिक वाचा..

जेईएस महाविद्यालयांमध्ये युवा जल्लोष…

स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव तसेच सर्वांगीण विकासास मदत होते; अभिनेते डॉ. राजू पाटोदकर जालना: युवा जल्लोष तथा महाविद्यालयीन स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होते. अशी स्नेहसंमेलने ही जीवनात मिळालेली ही सुवर्ण संधी आहे, युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन मराठी नाट्य व सिने अभिनेते डॉ.राजू पाटोदकर यांनी जालनाच्या जेईएस महाविद्यालयाच्या […]

अधिक वाचा..

हे आहेत देशातील सर्वात कमी फी असलेले मेडिकल कॉलेजेस…

काही हजारांत होईल MBBS… औरंगाबाद: मेडिकल हा करिअरचा सर्वाधिक मागणी असलेला हा पर्याय आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी त्यात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात. डॉक्टर होण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे. भारतात दरवर्षी 11 लाखांहून अधिक विद्यार्थी NEET द्वारे 56,000 जागांवर प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा करतात. देशातील काही सरकारी महाविद्यालयांमध्येच सवलतीच्या दरात एमबीबीएसचा अभ्यास करण्याचा […]

अधिक वाचा..