‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत पारदर्शकता राखा; विभागनिहाय कार्यशाळा घ्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सतर्कतेने करण्यात यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. योजनेचा कोणत्याही स्तरावर गैरफायदा होणार नाही, याची दक्षता घेत प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री गोगावले यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील कंपन्यांची तातडीने सुरक्षा तपासणी करा; नानासाहेब लांडे 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील हजारो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार सुरक्षा नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की केवळ कागदोपत्री देखावा केला जातो, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. परिसरातील सर्व कंपन्या, कारखाने, गोदामे, बांधकामस्थळे आणि कंत्राटदार आस्थापनांची संयुक्त व अचानक सुरक्षा तपासणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी […]

अधिक वाचा..

‘मिसिंग लिंक’ धोकादायक; भ्रष्टाचाराचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा; अनंत गाडगीळ

मुंबई: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी या प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी (ऑडिट) करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्धीपत्रकात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डोंगराळ भागातील बोगद्यांच्या आतील भागाला मजबुती देण्यासाठी जाड काँक्रीटचे लायनिंग केले जाते. हे लायनिंग निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीच्या […]

अधिक वाचा..

नगरविकास विभागात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; टीडीआर घोटाळे, स्मार्ट सिटी अपयशाची एसआयटी चौकशी करा; विजय वडेट्टीवार

मुंबई: नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नगरविकास विभागातील कथित भ्रष्टाचार, टीडीआर घोटाळे, स्मार्ट सिटी योजनेतील अपयश आणि निधीच्या गैरव्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले की, नगरविकास विभागाच्या मूळ अर्थसंकल्पात ६५ हजार कोटी रुपयांची तरतूद असताना केवळ तीन महिन्यांत त्यापैकी अवघा २० टक्के […]

अधिक वाचा..

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक तरतूद या निर्णयांना काँग्रेसचा विरोध नसला, तरी हे निर्णय विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जाहीर करण्यात आल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे. गाडगीळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारले की, राज्यात आचारसंहिता लागू […]

अधिक वाचा..

संशयाच्या उद्योगावर सवाल; न्यायव्यवस्था आणि तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई : देशातील तपास यंत्रणा, न्यायप्रक्रिया आणि उद्योगविश्व यांच्यातील संबंधांवर सध्या मोठी चर्चा सुरू असून, आरोप, अटक, आर्थिक दबाव आणि उद्योगांच्या मालकी बदलाच्या घटनांमुळे लोकशाही व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एखाद्या उद्योगपतीवर आरोप झाल्यानंतर सत्य-असत्यापेक्षा संबंधित कंपनीचे भवितव्य काय होणार, याबाबत अधिक चर्चा होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लेखात मांडलेल्या भूमिकेनुसार, अनेक प्रकरणांमध्ये आधी […]

अधिक वाचा..

MH-CET परीक्षेतील कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; सचिन सावंत

मुंबई: देशभरात NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, महाराष्ट्रातील MH-CET परीक्षेतही गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी Sachin Sawant यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, दहावी-बारावीमध्ये अत्यंत कमी गुण मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांना MH-CET मध्ये १०० पर्सेंटाइल किंवा ९९.९ पेक्षा […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

मुंबई: राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या असून, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढासळत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरांमधील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीनतेचे नव्हे, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचे द्योतक असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद व […]

अधिक वाचा..