भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

मुंबई: राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या असून, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढासळत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरांमधील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीनतेचे नव्हे, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचे द्योतक असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद व […]

अधिक वाचा..

सर्व कलमांची सखोल छाननी करून काळानुरूप बदल संवेदनशील शब्दप्रयोगासह प्रस्तावित करा

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण,भिक्षेकरी यांची गरिमा राखण्याची काळजी घ्या नागपूर: महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क, सामाजिक संवेदनशीलता आणि आधुनिक धोरणात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण अधिनियमातील सर्व कलमांची बारकाईने छाननी करून उचित, सन्मानजनक आणि काळानुरूप शब्दांचा समावेश करण्यात यावा, […]

अधिक वाचा..

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून आचार संहितेची पायमल्ली, भाजपा महायुतीविरोधात हजारो तक्रारी

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचे ‘पैसा फेक तमाशा देख’ वगनाट्य रंगले… पुणे: नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न […]

अधिक वाचा..

कवलापूर येथे विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून तात्काळ सर्वेक्षण करा

मुंबई: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कार्गो विमानतळ व नागरी विमानतळ संदर्भात बैठक […]

अधिक वाचा..

एसटीसाठी १७४५० कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शांतता,व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर शहरात शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार तसेच RAF कंपनीचे १ अधिकारी व ४० जवान सहभागी झाले होते. हा रूट मार्च शिरूर पोलिस […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..

विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हावे 

मुंबई: देशात प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकीय ज्ञान न देता प्रात्यक्षिकवर आधारित ज्ञान देणे गरजेचे आहे. ज्या देशामध्ये प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हायला पाहिजे, […]

अधिक वाचा..