सर्व कलमांची सखोल छाननी करून काळानुरूप बदल संवेदनशील शब्दप्रयोगासह प्रस्तावित करा

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण,भिक्षेकरी यांची गरिमा राखण्याची काळजी घ्या नागपूर: महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क, सामाजिक संवेदनशीलता आणि आधुनिक धोरणात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण अधिनियमातील सर्व कलमांची बारकाईने छाननी करून उचित, सन्मानजनक आणि काळानुरूप शब्दांचा समावेश करण्यात यावा, […]

अधिक वाचा..

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून आचार संहितेची पायमल्ली, भाजपा महायुतीविरोधात हजारो तक्रारी

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचे ‘पैसा फेक तमाशा देख’ वगनाट्य रंगले… पुणे: नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न […]

अधिक वाचा..

कवलापूर येथे विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून तात्काळ सर्वेक्षण करा

मुंबई: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कार्गो विमानतळ व नागरी विमानतळ संदर्भात बैठक […]

अधिक वाचा..

एसटीसाठी १७४५० कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शांतता,व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर शहरात शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार तसेच RAF कंपनीचे १ अधिकारी व ४० जवान सहभागी झाले होते. हा रूट मार्च शिरूर पोलिस […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..

विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हावे 

मुंबई: देशात प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकीय ज्ञान न देता प्रात्यक्षिकवर आधारित ज्ञान देणे गरजेचे आहे. ज्या देशामध्ये प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हायला पाहिजे, […]

अधिक वाचा..

मराठा समाजाचा नवा आदर्श; लग्न समारंभासाठी आचारसंहिता जाहीर

संभाजीनगर: दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. समाजातील अनावश्यक खर्चांना फाटा देत, साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने विवाह सोहळे साजरे करण्यासाठी ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख वैशिष्ट्ये उपस्थिती मर्यादित: लग्न समारंभासाठी केवळ १०० ते २०० लोकांची उपस्थिती असावी. हुंडाबंदी: हुंडा घेण्यास आणि देण्यास सक्त मनाई. डीजेला फाटा: डीजेऐवजी […]

अधिक वाचा..

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातिनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी 

मुंबई: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सन १९९२ सालापासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठ यश मिळाले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची अवैध दारू विरोधात धडक मोहीम; गावठी आणि विदेशी दारू जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर अंकुश आणण्यासाठी सलग चार ठिकाणी धडक कारवाया करत गावठी हातभट्टी दारू व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवायांमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. पहिली कारवाई मलठण येथे केली असून (दि. २३) एप्रिल रोजी मौजे मलठण परिसरात अवैध दारू […]

अधिक वाचा..