मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस व ‘वंचित’ची आघाडी; वंचित ६२ जागा लढवणार

राज्यातील राजकारणात आजपासून नव्या पर्वाला सुरुवात, हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसे अधिकार दोन्ही पक्षाने दिलेले आहेत. आज काँग्रेस […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या पुढाकाराने दादर येथील टिळक भवनमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. निवडणूक व्यवस्थापन, महापालिका प्रशासन आणि माहिती अधिकार (RTI) या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका व आरटीआयसंदर्भात सविस्तर माहिती दिली. “माहिती कशी मिळवायची आणि […]

अधिक वाचा..

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी ओबीसी आरक्षणावरील ‘टांगती तलवार’ कायम

भाजप सरकारने ओबीसी समाजाची केली दिशाभूल; विजय वडेट्टीवार चंद्रपूर: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय […]

अधिक वाचा..

लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहे 

सरकार भाजपचे असल्याने विकास निधीची भाषा करून धमकावले जाते आहे त्यामुळे निवडणुका पारदर्शक होतील का? नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक त्यात बायको, वहिनी,मामे भाऊ, दीर,बहिण,मुलगा बिनविरोध निवडणूक जिंकून आले,अनेक ठिकाणी गुलाल उधळला इथे लोकशाही पायदळी तुडवण्यात आली आहे. सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..

मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा,मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी

मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी मुंबई: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य […]

अधिक वाचा..

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना धक्का; ज्येष्ठ नेत्याने सोडली साथ

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधून एकत्र येण्याच्या चर्चेला उत आला आहे. अशातच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून मनातील खदखद व्यक्त करत थांबण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही दिवसांआधी त्यांनी आपली […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी सोमवारी दिल्लीत बोलावली खासदारांची महत्वपूर्ण बैठक

रविवारी रात्रीच शिवसेना खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच […]

अधिक वाचा..

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव अन् राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीस…

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली […]

अधिक वाचा..

बेस्टच्या निवडणुकीत पराभव का झाला? ठाकरे गटाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई: मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. पण या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते. […]

अधिक वाचा..