बेरोजगारीच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा.

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. […]

अधिक वाचा..

विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई: शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन आयुक्त […]

अधिक वाचा..

इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत जयंतराव पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट

‘ईश्वरपूर’ नामांतर करताना ‘उरूण’चाही समावेश व्हावा यासाठी शासनाला निर्देश द्यावेत; जयंतराव पाटील यांची राज्यपालांकडे मागणी मुंबई: इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांनी आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेतली. या दरम्यान त्यांनी राज्यपाल महोदयांना निवेदनही दिले आहे. जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठीजे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. मुंबईत […]

अधिक वाचा..

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा ‘रोजगार सत्याग्रह’ यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू […]

अधिक वाचा..

कोकाटेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नाबद्दल रोहित पवार अजितदादांना करणार ही विनंती

मुंबई: विधीमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन रमी खेळताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आणल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याीची मागणी केली होती. मात्र माणिकराव कोकाटे यांनी आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल; हर्षवर्धन सपकाळ

परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत […]

अधिक वाचा..

घोड धरणाचा पाणी प्रश्न पेटणार…? साकळाई उपसा योजनेस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणाचा पाणी प्रश्न भविष्यात पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले असुन या धरणातुन नगर तालुक्यातील गावांसाठी होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरुर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. तसेच हि योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकरी तसेच […]

अधिक वाचा..

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा असताना निधीची तरतूद कमी

मुंबई: पुरोगामी महाराष्ट्रात महिलाना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली यावर काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. पुणे बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली जर महिला सगळीकडे असुरक्षित असतील तर मग सुरक्षित कोण? NCRB ची आकडेवारी सांगते महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण […]

अधिक वाचा..

गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा; नसीम खान

अमित शाह व भाजपा विरुद्ध भव्य निषेध मोर्चा  मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या लोकांसोबत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य […]

अधिक वाचा..