सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात; मीरा भाईंदर जमीन प्रकरणावरून सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला. कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी नागपुरात केला. […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी […]

अधिक वाचा..

भाषाविषयात हिंदुत्व आणू नका; मराठी भाषा-माणूसच आमचं सर्वोच्च प्राधान्य; राज ठाकरे

मुंबई: भाषाविषयावर आंदोलन करणं हा आजार असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत “भाषेच्या प्रश्नात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नका,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषेबाबत […]

अधिक वाचा..

कामगार कायदे लागू, मात्र माध्यमकर्मी अजूनही वंचित; पत्रकार नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: केंद्र सरकारने देशात चार नवीन कामगार कायदे लागू करून कामगार सुधारणा दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले असले, तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांतील पत्रकार व माध्यमकर्मी या कल्याणकारी तरतुदींंपासून अजूनही वंचित असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील हजारो माध्यमकर्मी आजही सामाजिक सुरक्षा, नोंदणी, किमान वेतन आणि कल्याणकारी योजनांपासून दूर आहेत. […]

अधिक वाचा..

जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..

अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न; मोदींनी जाहीर माफी मागावी

मुंबई: सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या गझनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने वाराणसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवून इतिहास पुसण्याचे घोर पाप केले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, अहिल्यादेवींच्या ३०० व्या […]

अधिक वाचा..

शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

जामखेड सभेतील विधानपरिषद सभापती व सदस्यांच्या अवमान प्रकरणाचा मुद्दा विधानपरिषदेत जोरदारपणे मांडला

नागपूर: अहिल्यानगरातील जामखेड येथे २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांच्या प्रचारसभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेच्या रचना, कामकाज आणि सभापतींच्या पदाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत जोरदारपणे मांडण्यात आला. या वक्तव्यामुळे सभागृहाचा गौरव, परंपरा आणि घटनात्मक पदांचा अपमान झाल्याचा ठपका लावत आ. प्रवीण दरेकर व आ. […]

अधिक वाचा..

इंडिया आघाडीत नव्या पक्षाच्या सहभागाचा मुद्दा इंडिया आघाडीचा, मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

मुंबई: निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते, त्यामुळे कोणी काही […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडे यांच्या कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीवर सरकारने काय कारवाई केली

मुंबई: राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी, मराठा कुणबी,कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचे एकमत झाल्याची भूमिका मांडली आहे. याबाबत सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. राज्याचे इतर मागासवर्गीय व बहुजन […]

अधिक वाचा..