“माझा मोठा भाऊ हरपला”! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

मुंबई: बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात कधीही न विसरता येणारा ठरला. एका दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकस्मात निधन झाले असून संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. ठाम निर्णयक्षमता, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या दु:खद घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

धुळे जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला

मुंबई: धुळे जिल्ह्याचे सुपुत्र जगप्रसिद्ध शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या कलाक्षेत्रात मोठी हानी झाली असून त्याच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, अशा शब्दांत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. राम सुतार […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई: असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांचा जीव गेला पण मुख्यमंत्री मात्र कबुतरांसाठी वेळ काढतात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

बिबट्याच्या हल्ल्यांवर ठोस कृती आराखड्याची मागणी जनआंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षांची शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही अशाच घटनेत आणखी एका चिमुकल्याचा […]

अधिक वाचा..

आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजोबाच्या निधनाच्या विरहात नातीचा मृत्यू झाला आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांचं वृद्धापकाळाने त्यांच्या गावी निधन झालं होत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगराव गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्या दरम्यान पूनम हिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला; मंत्री उदय सामंत

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा गेल्या पाऊण शतकाचा प्रत्यक्ष साक्षीदार हरपला मुंबई: मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, […]

अधिक वाचा..

विधानसभेत पराभूत झालेल्या मविआच्या १०० उमेदवारांची न्यायालयात याचिका

मुंबई: लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील घोड धरणात गेल्या तीन महिन्यांपासुन प्रचंड मोठया प्रमाणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा चालु असुन याबाबत व्हिडीओ करुन तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी गुनाट येथील शेतकरी भिवसेन कोळपे यांना फोनवर धमकी देत त्यांच्या शेतीतील मोटारीसह, बोअरवेल व केबलची तोडफोड करत लाखों रुपयांचे नुकसान केले […]

अधिक वाचा..

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला…

मुंबई: “कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना […]

अधिक वाचा..