शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख राजू राठोड यांचे निधन; सत्तार म्हणाले, ‘विश्वासू साथीदार गमावला’

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच राजू राठोड यांचे आज मुंबईतील बेलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा गावचे सरपंच म्हणून राजू राठोड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात […]

अधिक वाचा..

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची आई कायमची गेल्याचा समज असताना ती मोठ्या अपघातातून सुखरूप बचावते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मृती हरवते. तिला कमळीच्या बालपणीच्या आठवणी असतात, पण समोर उभी असलेली स्वतःची लेकही ती ओळखू शकत नाही. आईच्या या अवस्थेमुळे कमळीवर तिच्या सांभाळाची मोठी […]

अधिक वाचा..

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. “अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार […]

अधिक वाचा..

“माझा मोठा भाऊ हरपला”! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

मुंबई: बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात कधीही न विसरता येणारा ठरला. एका दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकस्मात निधन झाले असून संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. ठाम निर्णयक्षमता, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या दु:खद घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

धुळे जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला

मुंबई: धुळे जिल्ह्याचे सुपुत्र जगप्रसिद्ध शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या कलाक्षेत्रात मोठी हानी झाली असून त्याच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, अशा शब्दांत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. राम सुतार […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई: असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांचा जीव गेला पण मुख्यमंत्री मात्र कबुतरांसाठी वेळ काढतात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

बिबट्याच्या हल्ल्यांवर ठोस कृती आराखड्याची मागणी जनआंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षांची शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही अशाच घटनेत आणखी एका चिमुकल्याचा […]

अधिक वाचा..

आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजोबाच्या निधनाच्या विरहात नातीचा मृत्यू झाला आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांचं वृद्धापकाळाने त्यांच्या गावी निधन झालं होत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगराव गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्या दरम्यान पूनम हिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला; मंत्री उदय सामंत

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा गेल्या पाऊण शतकाचा प्रत्यक्ष साक्षीदार हरपला मुंबई: मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, […]

अधिक वाचा..