महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही

शिर्डी: महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

राज्याच्या विकासात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची साथ…

मुंबई: राज्य शासनाच्या विविध विभागांतील सुमारे 1 लाख 50 हजार गट ‘अ’ व गट ‘ब’ राजपत्रित अधिकाऱ्यांचे समान प्रश्न शासन-प्रशासनाशी चर्चाविनिमयाद्वारे सोडविण्यासाठी दि.7 फेब्रुवारी 1986 रोजी “महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ” हे व्यासपीठ स्थापन करण्यात आले. सद्य:स्थितीत सर्वच खात्यांतील अधिकाऱ्यांच्या 70 खाते संघटना महासंघाशी संलग्न आहेत. वर्ष 1990 मध्ये महासंघास “शासनमान्यता” मिळालेली असून, 1995 पासून […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई: ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास […]

अधिक वाचा..
pandurang-ulpe-kolhapur

तात्या झाले जिवंत! रुग्णवाहिका खड्ड्यातून गेली अन् मृतदेहाची हालचाल सुरू झाली…

कोल्हापूर: कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ तात्या उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल सुरू झाली. कोल्हापूरच्या कसबा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाला दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळेल व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असे त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर माहिती […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारच्या काळात गुंडाराज; महाराष्ट्रात फोफावलेल्या गुंडाराजचा अंत करा

मुंबई: परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ; अंबादास दानवे

नागपूर: महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेशा व्यक्तीमत्त्वाची निवड विधान परिषदेचे सभापती करण्यावर सर्वांनी एकमत केलं. विरोधी पक्षानेही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.आपली कारकीर्द येणाऱ्या काळात चांगली व राज्याच्या प्रगतीची जावो, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी नवोनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिले. […]

अधिक वाचा..

समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नागपूर: राज्यात गेली अडीच वर्ष महायुती सरकारने विकास आणि लोक कल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने जनतेने विश्वास टाकला आणि त्यामुळे महायुती सरकारची नवी इनिंग सुरु झाली आहे. राज्यातील जनतेचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. वीधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..
bride

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

सांगली : राज्यभरात अनेक ठिकाणी खोटे लग्न लावून गंडा घालणार्‍या टोळीने कर्नाटकमध्येही अनेकांना फसवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीतील पल्लवी मंदार कदम तथा परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिने धुळे, शिरूर आणि कर्नाटकातील निपाणी येथील अनेकांची खोटी लग्ने लावून फसवणूक केली आहे. सध्या फसवणूक करणार्‍या टोळीची कारागृहात रवानगी […]

अधिक वाचा..

गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम

मुंबई: देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी  गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार […]

अधिक वाचा..