मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणी १९ वर्षे गजाआड, तुरुंगात राहून मिळवल्या २२ पदव्या

नागपूर: मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आणि आता उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात राहून २२ पदव्या मिळविल्या आहेत. त्यामध्ये ‘एमबीए’सह तीन विषयात ‘एमए’ या पदव्यांचाही समावेश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्‍या केंद्राच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठी प्रमाणपत्र परीक्षा उपक्रम राबवला जातो. अभ्यासात […]

अधिक वाचा..

दुबे तुम मुंबई मै आजाओ, समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (शुक्रवार) मीरा रोड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्य्यावर आक्रमक भूमिका मांडली. तसेच, हिंदी सक्तीवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पटक-पटक के मारेंगे या इशाऱ्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिलं. राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी तो एक भाजपचा दुबे नावाचा खासदार काय बोलला? […]

अधिक वाचा..

…तर मुंबईवर हल्ला झालाच नसता

मुंबई: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शिफारशीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राज्यसभेवर खासदारकी मिळवून उज्वल निकम यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. खासदारकी मिळाल्यानंतर उज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वकिलीच्या कार्यकाळाचा प्रवास मांडला. यावेळी बोलताना उज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तचे नाव घेत 267 जणांचा […]

अधिक वाचा..

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा परिसरात जल्लोष केला. याबाबत मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मराठी अस्मितेबरोबरच, मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात; रमेश चेन्नीथला

राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे. मराठी हिंदी वाद व […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिका ‘एल’ विभागातील नागरी समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जोरदार मोर्चा

मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी भव्य व शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला.या विभागात सुमारे ९ ते ११ लाख नागरिक राहतात, परंतु आजही त्यांच्या जीवनात गटारसफाई, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण व सुरक्षित रस्ते या मुलभूत […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई नाही महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलणार

मुंबई: वीस वर्षापूर्वी दुरावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत. नुकत्याच घेतलेल्या विजयी मेळाव्यास मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.हा सर्व प्रतिसाद पाहता भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असे आडाखे काही राजकीय धुरणींनी बांधले होते. मात्र, राज व उद्धव ठाकरेंनी या […]

अधिक वाचा..

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई बँकेचा पुढाकार

मुंबई: महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक ४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला बचत गट व व्यावसायीकांना कर्जसुविधा आणि बाजारपेठ निर्मितीशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी […]

अधिक वाचा..

विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका… मुंबई: भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून, 2025 रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून लोकसभा अध्यक्ष […]

अधिक वाचा..

महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला

मुंबई: राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. इतकी वर्ष सत्तेत राहुन महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर हल्लाबोल केला. मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, कुणाचा बाप जरी आला किंवा सात पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..