कुणबी प्रमाणपत्रांवरून नवा वाद; विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात तक्रार

छत्रपती संभाजीनगर: कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे महसूल मंत्री Radhakrishna Vikhe Patil आणि मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांच्या विरोधात Chhatrapati Sambhajinagar Police परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघडे पाटील यांनी ही तक्रार दाखल केली असून, कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची व दिशाभूल […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत प्रतिमांवरून नवा वाद; महापौरांच्या कृतीवर कोल्हापुरात संताप

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र, डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

अधिक वाचा..

मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून नवा वाद; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून राजकीय वाद चिघळला आहे. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पेंग्विन रँडम […]

अधिक वाचा..

महायुतीत निधीवरून नवा वाद

पुणे: राज्यात महायुती सरकारमधील अंतर्गत कुरघोडी आणि सत्तेतील भागीदारांमधील नाराजीच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता नगरविकास खात्यातील मोठ्या रकमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे. यामुळे फडणवीस यांनी शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि भरभरून निधी खर्च […]

अधिक वाचा..

संभाजी भिडेंनी फोडलं नव्या वादाला तोंड; म्हणाले

कोल्हापूर: आपल्या वादग्रस्त वक्तव्याने काय चर्चेत असणारे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादात उडी घेतली आहे. देशाचा ध्वज तिंरगा नसून भगवा असायला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता राज्यभरात मोठा गदारोळनिर्माण होण्याची परिस्थिती आहे. कोल्हापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगत मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर भगवा […]

अधिक वाचा..