दिल्ली ते गल्ली, भा.ज.प. ची सारी गळती सरकार; अनंत गाडगीळ    

मुंबई: पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल रोडच्या भिंतीतून ४ महिन्यातच […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींच्या राजवटीत, शेतकरी, कामगार, महिला, तरूण सेफ नाहीत; प्रियंका गांधी 

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस […]

अधिक वाचा..

महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपाकडून पायमल्ली

मुंबई: देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम अदानींना देण्यासाठी मविआचे सरकार […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक असून ऑफिस आणि व्यवसायाच्या कामात तुम्हाला जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्ही हुशारीने घेतलेले निर्णय लाभदायक सिद्ध होतील. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. संध्याकाळी एखाद्या समारंभात सहभागी होणार आहात. वृषभ: आजचा दिवस फारसा ठिक नाही. संपत्तीचे वाद तुमचे नुकसान करणार आहेत. भौतिक सुखात वाढ होणार आहेत. तुमचे विचार इतरांसमोर ठामपणे मांडण्यात तुम्ही यशस्वी […]

अधिक वाचा..

शिंदेसेनेकडून टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर्स दाखवून छुपा प्रचार, स्टार प्रवाह वाहिनी व शिंदे सेनेवर गुन्हे दाखल करा…

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची पोस्टर्स दाखवून छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची क्लुप्ती अवलंबलेली आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयागाने याची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सांवत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर सदर घटना गंभीर असून निवडणूक […]

अधिक वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील सभेस अल्प प्रतिसाद

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक पक्षाच्या स्टार कॅम्पेनर्सच्या सभांचा धडका सुरू आहे. मात्र अशातच काल छत्रपती शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या […]

अधिक वाचा..

तुलसी विवाहानंतर सुरू होणार लगीन सराई; जाणून घ्या मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त

आज 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला गेला. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना सुरुवात होईल. तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या विवाह मुहूर्तांबद्दलची माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे. मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त नोव्हेंबर 2024:- 17, 22, 23, 25, 26, 27 डिसेंबर 2024:- 3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23, 24, 26 जानेवारी […]

अधिक वाचा..

राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शासनाचा मोठा निर्णय

मुंबई: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली आहे. त्यामुळेच, शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातली शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर […]

अधिक वाचा..

ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे कटेंगे बटेंगें

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या […]

अधिक वाचा..

संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु

नंदूरबार: संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधाना रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. […]

अधिक वाचा..