पुणे–नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर; राज्य महामार्ग पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे–नगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आता गंभीर बनली असून नागरिकांनी राज्य महामार्ग पोलिसांवर तसेच जिल्हा वाहतूक शाखेवर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव गणपती, खंडाळे माथा, एल &टी फाटा, कारेगाव अशा ठिकाणी दररोज दोन – दोन कि.मी.भर लांब कोंडीची पुनरावृत्ती होत आहे. नागरिकांच्या मते, “राज्य महामार्ग पोलिसांचे […]

अधिक वाचा..

शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर–तर्डोबाची वाडी–गोलेगाव–निमोणे–गुनाट–निर्वी, शिंदोडी तसेच शिरूर–रामलिंग–आण्णापूर या मार्गांवर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यांचे अक्षरशः “खड्ड्यांचे साम्राज्य” निर्माण झाले आहे. वाहनधारकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास […]

अधिक वाचा..

शिरूर शहरापासून कोंढणओढ्या पर्यंत शेकडो खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रीस्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहराच्या हद्दीपासून कोंढण ओढ्या पर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे. शेकडो खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रंचड हाल होत असून, काही ठिकाणी रस्ता फाटला आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी मात्र या सर्व परिस्थितीकडे डोळे झाक करून निद्रिस्त अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर सहाय्यक अभियंता, हे कार्यालयात भेटतच […]

अधिक वाचा..

सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ

मुंबईतील टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णयाची टोलवाटोलवी मुंबई: मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत […]

अधिक वाचा..

रस्त्यांच्या कामात फक्त 25% प्रगती; मुंबईकरांना पुन्हा खड्ड्यांचा आणि गटाऱ्यांचा पावसाळा गिफ्ट

मुंबई: मुंबईतील तब्बल 2121 रस्त्यांपैकी फक्त 479 रस्त्यांचेच काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे उर्वरित 1600 हून अधिक रस्ते अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. संपूर्ण शहर खोदलेलं, धुळीत न्हालेलं आणि आता पावसाने चिखलात बुडण्याच्या उंबरठ्यावर आहे. महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारीत बैठक घेऊन 31 मे पर्यंत काम पूर्ण व्हावं, असं स्पष्ट आदेश दिला होता. मात्र या आदेशाची अक्षरशः पायमल्ली […]

अधिक वाचा..