विविध योजनांची माहिती व प्रचार -प्रसार करण्यासाठी पालखी मार्गावर परिवहन विभागाचा चित्ररथ

मुंबई: परिवहन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व त्यांचा जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाचा चित्ररथ यंदा तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर दिंडी सोबत मार्गक्रमण करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री. ‌प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात नियोजन व मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री सरनाईक हे स्वतः उद्या (११जुन रोजी) पंढरपूर पर्यंत या पालखी मार्गाचा दौरा करणार […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाकडील ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या मुंबई: मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री […]

अधिक वाचा..

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार; प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ” स्मार्ट बसेस ” घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या ३ हजार बसेस खरेदी च्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एस.टी. महामंडळाचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्‍या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे. अशी माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप […]

अधिक वाचा..

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही. अशी माहिती परिवहन मंत्री […]

अधिक वाचा..

प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर […]

अधिक वाचा..

राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी

मुंबई: राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी दुर्गंधी व आजार फैलावतात. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय जारी करून या सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

मुंबई: एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे. सन. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. श्री.र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावे

मुंबई: येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक […]

अधिक वाचा..