राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा 

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी आज स्वतः उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील पीडित २० मुली आणि ९ मुले यांची त्यांनी शासकीय निरीक्षणगृहात […]

अधिक वाचा..

शेतमालाच्या खरेदीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाने व्यावसायिक वृत्ती अंगिकारावी 

मुंबई: शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपले महत्व आणि गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महासंघाने व्यावसायिक आणि सकारात्मक मानसिकतेने काम करावे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या […]

अधिक वाचा..

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सविंदणे जिल्हा परिषद शाळेचे अभूतपूर्व यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश मिळवत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता दुसरी मधील कृष्णा रामचंद्र देशमुख याने १४४ गुण मिळवत संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शिवण्या अजित पडवळ याने १३८ गुण मिळवत […]

अधिक वाचा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा संविधान हाती घेऊन सहकाऱ्यांसह ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रवेश

समतेचा, बंधुत्वाचा, संविधानाचा विचार नांदू दे”, अशी प्रभू रामाच्या चरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कामना नाशिक: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा

प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन समाजात सौहार्दतेसह सहिष्णुतेची मूल्ये बळकट करूया मुंबई: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या […]

अधिक वाचा..

राज्य सरकारच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत 1 रुपयाही न देता अशी करा वारसनोंद

मुंबई: महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, यामध्ये तुम्ही आता सहजपणे व मोफत वारसनोंद करू शकता. कोणत्या कागदपत्रांची गरज आहे. वारसनोंदीसाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रे तलाठ्यांना द्यावी लागतील 1) मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला 2) वंशावळीसह प्रतिज्ञापत्र 3) सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५ शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम ग्रामीण […]

अधिक वाचा..

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्य सरकारने अखेर भरतीला दिला हिरवा कंदील

मुंबई: राज्यातील हजारो उमेदवारांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा करत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजेच शिक्षकेतरांच्या आयुष्यातील एक नवा वळणबिंदू ठरणार आहे. कुठल्या पदांची भरती होणार कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक या पदांची १००% नामनिर्देशनाने भरती करण्यात येणार असून, अनुकंपा नियुक्तीलाही समावेश आहे – जे खरोखरच अनेक […]

अधिक वाचा..

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा

मुंबई: शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकार कडून विशेष […]

अधिक वाचा..

दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

वर्धा: महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबतीतील सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज केली. या धोरणाच्या आधारेच यापुढे राज्यातील सर्व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवायचा सरकारचा प्रयत्न! कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?

मुंबई: काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात […]

अधिक वाचा..