‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली

कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील अजातशत्रू व दूरदर्शी नेतृत्व गमावले असून, “ज्ञानाचा महासागर हरपला” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कोल्हापुरात डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटलेल्या या महान व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नसल्याचे सांगितले.

शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्याचाही उल्लेख करत, डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मिळालेली मानद डॉक्टरेट आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याच संस्थेतून घेतलेले वैद्यकीय शिक्षण या आठवणींना उजाळा दिला. तसेच, “मोठी स्वप्ने पाहा; पण ती सर्वसामान्यांच्या हितासाठी पाहा,” हा डॉ. पाटील यांचा विचार कायम प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत