राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६.०५ कोटींच्या निधीस मान्यता

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती खराब झाली असून. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले […]

अधिक वाचा..

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले

मुंबई: राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळात […]

अधिक वाचा..

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर; उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

शिंदेसेनेतील ‘या’ जेष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून राज्यमंत्र्यांना विनवणी

सावंतवाडी: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्रकार परिषदेत शिंदे सेनेच्या महिलांनी एक अनोखी मागणी ठेवली आणि सर्वानाच धक्का दिला. आपल्या वरिष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून चक्क राज्यमंत्र्यांना विनवणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. केसरकर मागणार नाहीत पण आमची विनंती मुख्यमंत्र्या पर्यत पोचवा दीपक केसरकर यांना मंत्री करा अशी मागणी यावेळी केली. ही मागणी ऐकून प्रत्यक्षात […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

मुंबई:राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाहीये. यामध्ये कोल्हापूरातील १७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाना भारतीय मराठा महासंघाने विरोध केला आहे. शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय मराठा महासंघाने […]

अधिक वाचा..

ठाण्यासह कोकणात तुफान पाऊस बरसणार, परतीच्या पावसाचा राज्यभरात धुमाकूळ

मुंबई: भारतीय हवामान विभाग (IMD), स्थानिक हवामान अभ्यासक आणि उपलब्ध माहितीवर आधारित आज (14 सप्टेंबर) रोजी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र (depression) आणि परतीच्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण मुंबई, ठाणे, पालघर, […]

अधिक वाचा..

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार धोक्यात! कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत

औरंगाबाद: राज्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबविण्याचा आदेश दिला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार थांबविण्याचा आदेश राज्यभरातील दीड लाख शिक्षकांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे न दिल्यास पुढील महिन्याचा पगार थांबविला […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उप समितीची स्थापना, आजच GR निघणार

मुंबई: मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली […]

अधिक वाचा..

‘पुणे-लोणावळा’ रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता 

मुंबई: पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५ हजार १०० कोटी […]

अधिक वाचा..

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मिळणार एक्स्ट्रा सुट्टी

मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महिन्यात राज्य शासनाकडून एक अतिरिक्त सुट्टी मंजूर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात फडणवीस सरकारकडून एक एक्स्ट्रा सुट्टी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात एक एक्स्ट्रा सुट्टी देण्यात येणार आहे. राज्यात पुढील आठवड्यात एक्स्ट्रा […]

अधिक वाचा..