मुलासाठी कुणासोबतही झोपेन’ वक्तव्यामुळे ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित वादात

मुंबई: ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि Bigg Boss OTT 3 फेम Chandrika Dixit पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीतील तिचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये वडा पावचा स्टॉल लावल्यामुळे चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियावर ‘वडा पाव गर्ल’ म्हणून मोठी लोकप्रियता […]

अधिक वाचा..

किर्तनातील वक्तव्याचा राग; किर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर: किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या कीर्तनातील एका वक्तव्यामुळे […]

अधिक वाचा..

इराणच्या घडामोडींवरून मंदाना करिमीचे वादग्रस्त वक्तव्य; भारत सोडण्याची तयारी

मुंबई: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान इराणी वंशाची अभिनेत्री मंदाना करिमी हिने केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केल्यानंतर आता तिने भारत सोडून मायदेशी […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी: ‘काटा गँग’मध्ये फूट? तन्वी-प्रभूच्या नात्यात दुरावा; राखीच्या वक्तव्याने घरात खळबळ

मुंबई: ‘बिग बॉस’ हा असा खेळ आहे, ज्यात क्षणाक्षणाला समीकरणे बदलतात. मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होते, तर शत्रूही कधी मित्र बनतात. त्यामुळेच या खेळात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातही असाच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. घरात सध्या तीन गट स्पष्टपणे दिसत असून त्यातील ‘काटा गँग’मध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी विलीनीकरणावर ब्रेक! जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य; शिंदेंची स्पष्ट भूमिका

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा वेगाने पुढे सरकत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अजित पवारांची इच्छा दोन्ही गट एकत्र यावेत, अशी होती आणि त्यासाठी त्यांनी काही बैठका घेतल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र या चर्चेला आता अचानक ब्रेक लागल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे नेते […]

अधिक वाचा..

अंमली पदार्थ विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक; पोलीस अधीक्षकांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात […]

अधिक वाचा..

प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य दुर्दैवी व राजकीय संस्कारशून्य; राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र निषेध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब तसेच पवार कुटुंबीयांबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार आणि राजकीय संस्कारशून्य आहे. अशा विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. पार्थ पवार हे शरद पवार साहेबांना केवळ कुटुंबीय म्हणून भेटतात, असे विधान करून दरेकर यांनी केवळ एका कुटुंबावर […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली; तटकरे यांच्या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकीकडे सत्तास्थैर्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होत असतानाच, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विलीनीकरणास […]

अधिक वाचा..

जयंत पाटील यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींचा संताप

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात वाद उडाला आहे. जयंत पाटील म्हणाले होते की, “उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी १५ दिवसांनी झाला असता, तर काय घडले असते?”यावर प्रतिक्रिया व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “जयंत पाटील यांचे विधान महाराष्ट्रातील महिलांना किंवा राज्याला गरजेचे नाही. त्यांनी अशा […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरला! भाजप मंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार […]

अधिक वाचा..