राष्ट्रवादीत नवं राजकीय द्वंद्व! रोहित पवारांचे आरोप आणि सुनेत्रा पवार–नरेश अरोरा यांच्या भेटीने खळबळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. ज्यांच्यावर रोहित पवार यांनी गंभीर आक्षेप घेतले होते, त्याच नरेश अरोरा यांच्या टीमसोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये चर्चा केल्याने पक्षात नव्या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवारांचे आक्षेप आणि दावे अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर तब्बल तेरा दिवसांनी […]

अधिक वाचा..

ईव्हीएम सापडल्याने खळबळ! बार-हॉटेलच्या आवारात मशिन कशी? प्रशासनाकडे स्पष्टीकरण

मोहोळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी संपूर्ण राज्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे निवडणूक प्रशासनाची झोप उडाली आहे. मोहोळ शहराजवळील एका खाजगी बार व हॉटेलच्या परिसरात चक्क ईव्हीएम मशिन आढळून आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मशिन जमा करण्याची घाई […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या अनुदान घोटाळ्यात मुख्य आरोपीला अटक, महसूल विभागात खळबळ

मुंबई: शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सुमारे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे.पैठणकर हा घनसावंगी तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होता. महाघोटाळ्याची […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरला! भाजप मंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार […]

अधिक वाचा..

टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

बारामती: देशभरातील शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये नोकरी सोडावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा..

बेस्टच्या निवडणुकीत पराभव का झाला? ठाकरे गटाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई: मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. पण या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधूंच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

शिंदे गटाला भरली धडकी, उचललं मोठं पाऊल मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी २७ जुलै रोजी ६५ वा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एकही शब्द न बोलता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय की काय? अशी चर्चा आता सुरू झाली. कारण जेव्हा जेव्हा माणिकराव कोकाटे बोलतात तेव्हा तेव्हा वाद निर्माण झाला असं समजाच. दरम्यान आता कोकाटे बोलले देखील नाहीत, तरीही मोठा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंच्या एका कृतीमुळे राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा […]

अधिक वाचा..

सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात दोन रानगवे दिसल्याने खळबळ

शिरूर (अरुणकुमारमोटे): शिरूर तालुक्यातील सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात शुक्रवारी (ता.९) दुपारनंतर दोन रानगवे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे . मुंजाळवाडी येथील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका शेतात हे गवे फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या गव्यांचे चित्रीकरण देखील केले आहे. या घटनेनंतर कवठे येमाई चे माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून […]

अधिक वाचा..