विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक मुंबई: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार करुन आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये […]

अधिक वाचा..

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: जून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 मे 2025 पासून सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची 26 जूनपर्यंत मुदत होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ दि. 30 जुन 2025 […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रम मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून कणकवली व देवगड तालुक्यातील हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी ग्रामीण भागातील २९ शाळेतील हजार विद्यार्थ्यांना दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून आपल्या शालेय नातवंडाना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. आजी […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार

मुंबई: शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जुन पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने […]

अधिक वाचा..

माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षांनी पुन्हा भरवली शाळा; १९८६च्या आठवणींना दिला हृदयस्पर्शी उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे ठिकाण नाही, तर ती आठवणींची ठेव असते” हे विधान खरं ठरवत १९८६ साली दहावीमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा शाळेत हजेरी लावली. मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मलठण मध्ये ६० माजी विद्यार्थी एकत्र जमून आपल्या बालपणाच्या आणि शालेय जीवनाच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. पन्नाशीत […]

अधिक वाचा..

दारू महाग, नोकरभरती जाहीर! मंत्रिमंडळ बैठकीत मद्यप्रेमींना झटका, तर तरुणांना आणि विद्यार्थ्यांना खुशखबर

संभाजीनगर: झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकीकडे मद्यावरील शुल्कात वाढ करून मद्यप्रेमींना धक्का दिला आहे, तर दुसरीकडे मोठी पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करून दिलासाही दिला आहे. मद्यप्रेमींची चिंता वाढली  झालेल्या बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) तब्बल दीड टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल १४ हजार कोटींचा महसूल वाढणार […]

अधिक वाचा..

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत आज अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती प्र.संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. या प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये 9,435 नोंदणी […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब! जाऊन घ्या शासनाच्या महाज्योती मोफत टॅब योजना 2025 बद्दल

संभाजीनगर: आजच्या डिजिटल युगात शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता तंत्रज्ञानावर आधारित होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तर्फे इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती – अ (VJ-A), भटक्या जमाती – ब (NT-B), भटपा जमाती – क (NT-C), भटक्या जमाती – ड (NT-D), विशेष मागास प्रवर्ग […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत; दादाजी भुसे यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई: दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या […]

अधिक वाचा..

MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा […]

अधिक वाचा..