सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी शासन प्रशिक्षण केंद्र उभारणार का

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व उच्च शिक्षण परीक्षांची तयारी करण्यासाठी शासन सीमा भागात प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला. सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी सीमा भागाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्याना […]

अधिक वाचा..

आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप विकसित करावे

मुंबई: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने वर्षभराची दिनदर्शिका तयार करावी आणि शाळांना पूर्वकल्पना देऊन पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आरोग्य तपासणीपासून एकही […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई: बालभवनच्या नुतनीकरणाचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा की केवळ पाहणी दौऱ्यांचे शो-बाजी करायची; ॲड. अमोल मातेले

मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षणातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून प्रथमदर्शनी वाटते की, आता शिक्षण व्यवस्थेत काही तरी मोठा बदल होईल. पण प्रश्न असा आहे की, या दौऱ्यांतून केवळ सरकारी दवंडी पिटायची की विद्यार्थीहिताचे ठोस निर्णय घ्यायचे. राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई: युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. वाचनातून प्रगल्भता येते. विविध विषयांतील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर […]

अधिक वाचा..

विद्यार्थी हितासाठी कॅरी ऑन योजनेसदर्भात विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घ्यावा

मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापींठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र […]

अधिक वाचा..

एन.डी.स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी शालेय विद्यार्थांचा कलाविष्का

कलादिग्दर्शक नितिन देसाईंनी सुरु केलेली परंपरा फिल्मसिटीने जोपासली मुंबई: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्जत येथील एन. डी स्टुडीओ येथे प्रजासत्ताक दिनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सुरू केलेला हा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार […]

अधिक वाचा..

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! SSC बोर्डाकडून हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रवेशपत्र (हॉल तिकीट) कधी उपलब्ध होणार याची तारीख जाहीर केली आहे. प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख सोमवार, 20 जानेवारी 2025 पासून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ऑनलाइन डाऊनलोड करता येईल. कुठे मिळेल हॉल तिकीट महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.mahahsscboard.in” Admit Card” या लिंकवर क्लिक करून […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख गंभीर आणि अमान्य; अँड.अमोल मातेले

महाराष्ट्र शासनाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. एडवोकेट अमोल मातेले म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख केल्याने समाजात भेदभाव […]

अधिक वाचा..