हर घर तिरंगा; यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवता येणार तिरंगा…

‘या’ नियमांचे पालन करावे लागणार संभाजीनगर: मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी […]

अधिक वाचा..

शाळांना यंदा ४१ दिवसांची उन्हाळा सुटी! उन्हामुळे आजपासून शाळांची वेळ बदलणार…

औरंगाबाद: उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात (साडेसात ते साडेअकरा) भरणार आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वर्षातील ३६५ दिवसांपैकी ७६ दिवस पगारी सुट्ट्या (रविवार वगळून) असतात. त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो. आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या […]

अधिक वाचा..

या वर्षापासून शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करणार

मुंबई: भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण तसेच […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात फिट आल्याने बेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या चंद्रकांत गुलाबराव गुलाखे या व्यक्तीला रात्रीच्या वेळी फिट येऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणारे चंद्रकांत गुलाखे यांना २९ जानेवारी रोजी रात्रीच्या […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आयोजित परिषदेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन […]

अधिक वाचा..

मराठी संशोधन मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची होणार सांगता…

मुंबई: दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाची स्थापना १ फेब्रुवारी १९४८रोजी झाली. ही संशोधन क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे जिचे २०२२-२३ हे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्याची सांगता १ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यंदाचे वर्ष हे मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे! वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाअंतर्गत मराठी संशोधन मंडळाचे […]

अधिक वाचा..

अखेर दिड वर्षानंतर मंगलदास बांदल यांना जामीन मंजुर

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढल्याने बांदल यांच्यासह अनेक जणांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली होती. गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ मंगलदास बांदल हे तुरुंगात होते. […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) नजिक पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कार्यक्रमा संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत […]

अधिक वाचा..