Shikrapur Police Station

Video: शिरूर तालु्क्यातील चिमुकल्याची समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे हत्या? एक ताब्यात…

शिरूर : शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे चिडून नराधमाने साईराजचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर हत्येचे नेमके गूढ उकलणार आहे. सदर मृत्यू हा […]

अधिक वाचा..

पिकअप गँगचा धडाकेबाज पर्दाफाश; तिघे जेरबंद, ५ गुन्ह्यांचा भंडाफोड

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शेतवस्तीवरील वयोवृद्धांना लक्ष्य करत दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन दरोडे आणि तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री खैरेनगर (ता. शिरूर) येथे चार अज्ञात […]

अधिक वाचा..

शिरुर; पिंपरखेडच्या सौम्याचे उज्ज्वल यश, नवोदय विद्यालयासाठी निवड, सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी सौम्या सुनील वरे हिने शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नवोदय विद्यालयासाठी आपली निवड निश्चित केली आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण गावाची मान उंचावली असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात शरीर रोगमुक्त ठेवणारे पदार्थ

पावसाळ्यात शरीर रोगमुक्त ठेवण्यास मदत करू शकणारे विशिष्ट पदार्थ व सेवनाची पद्धत अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पावसाळ्याचा गारवा जसा मनाला सुखावतो तसाच ऋतू बदलाने आजारांचा धोकाही वाढतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि आजारा पासून दूर राहण्यासाठी या काळात निरोगी आहार महत्त्वपूर्ण असतो. लिंबूवर्गीय फळे मोसंबी, लिंबू आणि […]

अधिक वाचा..

जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणं फार महत्वाचं आहे. जर दिवसभराच्या थकव्या नंतर पुरेशी झोप मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. याच कारणाने एक्सपर्ट्स रोज कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देत असतात. तुम्हाला किती तासांच्या झोपेची गरज आहे हे तुमच्या वयावर अवलंबून असतं. कारण वयानुसार झोपेची गरज […]

अधिक वाचा..

धर्मांतरावर कडक लगाम! २००४चा मुद्दा पुन्हा तापला

मुंबई: राज्यात आमिष दाखवून किंवा सक्तीने होणाऱ्या धर्मांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आज विधानपरिषदेत यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक मांडण्यात आले. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २००४ साली मांडलेल्या अशासकीय विधेयकाचा संदर्भ विशेष ठरला. तसेच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या भूमिकेचीही आठवण करून देण्यात आली. २००४ च्या हिवाळी अधिवेशनात डॉ. गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; टिळक भवनात शक्तिप्रदर्शन

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे विविध पक्ष व संघटनांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास वाढत […]

अधिक वाचा..

युद्धाचा परिणाम! गॅस सिलिंडर महाग; सरकारने बदलले एलपीजीचे ५ नियम

मुंबई: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभर दिसून येत असून त्याचा फटका भारतालाही बसू लागला आहे. देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी गॅस वितरणातही उशीर होत आहे. त्यामुळे गॅससाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा आणि […]

अधिक वाचा..

निधी वाटपात पक्षपातीपणा; आदिवासी निधी वळवण्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

मुंबई: राज्यातील महायुती सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून अर्थसंकल्पातील निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा फक्त घोषणेतच राहिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी […]

अधिक वाचा..

दिल्लीत शिवसेनेची रणनीती बैठक; अधिवेशनात आक्रमक भूमिका ठरली

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पक्षाची भूमिका, मांडणीची रणनीती आणि सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशासमोरील आव्हानांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारा आर्थिक परिणाम, पुरवठा साखळीतील […]

अधिक वाचा..