kantilal-umap

देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण: कांतीलाल उमाप

शिक्रापूर : शालेय शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षितता त्याचप्रमाणे रॅगिंग विरोधी कायदा सर्वांनी बारकाईने समजावून घ्या. शालेय वयात विद्यार्थ्यांना दोन चाकी वाहने वापरास मनाई करा. या वयात विद्यार्थ्यांच्या अंगी कष्ट रुजविणे, शारीरिक क्षमतेचे संवर्धन करणे, विविध खेळांचे विद्यालयात आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 142 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण आहे. […]

अधिक वाचा..

जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलानेही संपवले जीवन

लातूर: जमीन विकून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईची ६ जुलै रोजी हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर मुलानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.७) रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या अनुषंगाने रेणापूर पोलिस […]

अधिक वाचा..

पुण्यात जादूटोण्यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ

पुणे: सासरच्या लोकांनी अघोरी प्रथा पाळून एका २२ वर्षीय विवाहितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री विवाहितेस नग्न होऊन झोपण्यास भाग पाडणे, मुलावर संशय घेऊन अघोरी चाचणी घेण्यास भाग पाडणे यांसारखे प्रकार तिच्यासोबत घडल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध […]

अधिक वाचा..

अजित पवार म्हणाले कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये बोलताना अजित पवार वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजित पवार यांनी तर ‘कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो’, असे वैतागून बोलून धन्यवाद मानले. पिंपरी […]

अधिक वाचा..

मनसेच्या राड्याचा सुरक्षारक्षकांना फटका; पाच जणांची बदली

पुणे: महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्‍यांनी केलेल्या राड्याचे पडसाद सुरक्षारक्षकांवर उमटले आहेत. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा ठपका ठेवत महापालिकेच्या दोन कायमस्वरूपी आणि तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी जारी केले. स्वच्छतेच्या विषयावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत असताना मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अ‍ॅड. […]

अधिक वाचा..

माझ हरवलेल पोरग 8 वर्षांनी सापडल, बघताच आईने मिठीत घेतल अन्…

बीड: काही क्षण हे शब्दात मांडण्याच्या पलीकडचे असतात. अश्रूंमध्ये साठवलेल्या आठवणी, हृदयात दडलेली आस आणि काळजाच्या एका कोपऱ्यात जपलेली शेवटची आशा. हे सगळं आज एका क्षणात खरं ठरलं आहे, जेव्हा 2017 पासून हरवलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या आई-वडिलांच्या मिठीत परत आला. हे शक्य झालं बीड पोलिसांच्या सततच्या प्रयत्नातून आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर.. […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ नेता भाजपाच्या दरबारात

मुंबई: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जनता दरबारचं आयोजन केलं होतं.. मुंबई महापालिकेतील जी उत्तर विभागात उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. आमदारांची पालकमंत्र्यांच्या जनतादरबारातील हजेरी चर्चचा विषय ठरला. लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेले जनता दरबार म्हटलं की त्यामध्ये जनतेची गा-हाणी आलीच. मात्र मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागासाठी उपनगर पालकमंत्री आशिष शेलारांनी जनता दरबार […]

अधिक वाचा..

खंडणी मागणारे पाच पोलिस कर्मचारी निलंबित

बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली. पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध […]

अधिक वाचा..

चहा- कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी-दुपारी की संध्याकाळी

एक गरम चाय की प्याली हो चहा म्हटलं की, अनेकांच प्रेमच. हल्ली चहाचे देखील अनेक प्रकार पाहायला मिळतात. गुळाचा, साखरेचा, आल्याचा… आपल्यापैकी अनेकजण सकाळच्या दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने करतात. सकाळचा चहा म्हणजे दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवणं. आळस, झोप किंवा कंटाळा आला की आपल्या जिभेवर चहाची चव रेंगाळू लागते. अनेकांना दिवसभरात चहाच आणि तर कॉफी […]

अधिक वाचा..

डिंक म्हणजे संजीवनी! उष्माघात, त्वचेचे विकार, डिहायड्रेशनच्या समस्येवर फायदेशीर

डिंक म्हटलं तर उष्णतेचा पदार्थ. हिवाळा सुरु झाला की, आपल्या आहारात डिंकाचे प्रमाण वाढते डिंकाच्या लाडूपासून ते त्याच्या अनेक पदार्थांची चव आपण चाखतो. उन्हाळ्यात डिंक खाणे म्हणजे शरीरातील उष्णता वाढवून घेणे. परंतु, डिंकामध्ये देखील अनेक प्रकार आढळतात. ज्यातला एक गोंद कटिरा. सध्या सोशल मीडियावर याचा अधिक प्रमाणात ट्रेंड सुरु आहे. उन्हाळा सुरु झाला की, डिहायड्रेशनच्या […]

अधिक वाचा..