निर्दोष नव्हे तर पुराव्यांच्या अभावी सोडण्यात आलेले आरोपी, मालेगाव निकालानंतर कॉंग्रेसचा घणाघात

मुंबई: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल लागला आहे. यानंतर एकीकडे महायुतीने कॉंग्रेसवर टीका केली असताना आता कॉंग्रेसनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एनआयएवर निशाणा साधला आहे. तसेच, […]

अधिक वाचा..

माणिकराव कोकाटेंचे ‘डिमोशन’, कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे

मुंबई: विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आलं आहे. कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर भरणे यांच्याकडे आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला […]

अधिक वाचा..

सोमनाथ सूर्यवंशीसाठी बाळासाहेबांनी सुप्रीम कोर्ट हादरवल

परभणी: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाने पुन्हा एकदा देशाच्या न्यायव्यवस्थेवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. विजयबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला युक्तिवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी परभणीतील न्यू मोंढा पोलिस स्टेशनमध्ये विजयबाईंनी केलेल्या अर्जानुसार एफआयआर दाखल करण्याचा आणि तपास सुरू करण्याचा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत तसेच विरोधक काहीच करु शकणार नाहीत. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असेल. पचनक्रिया आणि डोळे यांचे आजार डोके वर काढतील तसेच खर्चात वाढ होईल. आहारावर नियंत्रण ठेवा आणि प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ राहा मानसिक समाधान मिळेल. वृषभ: आजचा दिवस कुटुंबीयांना चांगला वेळ देणार आहात. शुभ […]

अधिक वाचा..

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा ‘रोजगार सत्याग्रह’ यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू […]

अधिक वाचा..

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार

गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री.खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी ‘स्त्री आधार केंद्रा’तर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे: १९८४ पासून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्रातर्फे यंदाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी “महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत एस. एम. जोशी सभागृह, पहिला मजला, पत्रकार भवन मागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे […]

अधिक वाचा..

दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादी दहशतवादीच, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

रेल्वे स्फोटाच्या निकालाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तसे मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का मुंबई: काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट […]

अधिक वाचा..

भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी

मालेगाव खटल्याच्या निकालाने हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७ वर्ष त्रास देण्याचे काम काँग्रेसने केले. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. […]

अधिक वाचा..

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा…

शिरुर (तेजस फडके) शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर या तीनही पोलीस स्टेशनवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांचे कार्यालय कारेगाव एमआयडीसी मध्ये आहे. साहेबांना भेटायचं म्हटल्यावर तिथे एक खाजगी कर्मचारी तैनात आहे. त्याच्या मनावरच तेथील सगळा कारभार चालत असुन साहेबांना भेटायला आतमध्ये सोडताना नागरिकांना मोबाईल बाहेर ठेवण्याची तो तंबी देत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..