पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध

आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला. पण कधी सुंठ वापरता का आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी […]

अधिक वाचा..

तुम्हालाही सारख्या शिंका येतात का? पाहा शिंका येण्याची कारण 

आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर काही तरी प्रतिक्रिया देते. जसे की गरम मसाला फोडणी टाकला की लगेच धास लागते किंवा खोकला येतो. धुळीचे कण डोळ्यांपुढे आल्यावर डोळे लगेच चुरचुरतात. या साऱ्या शरीराने दिलेल्या प्रतिसादात्मक क्रियाच आहेत. असेच काहीचे शिंकेचेही असते. माणसाला शिंका येणे ही […]

अधिक वाचा..

मोडाच्या उसळी चांगल्या असल्या तरी प्रमाणातच खाव्यात

मोड आलेली कडधान्यं रोज खाण्याची सवय हेल्थी फॅशन म्हणून रूढ होते आहे, पण कोणतीही गोष्ट फक्त आरोग्यदायी आहे म्हणून ती कितीही आणि केव्हाही खाऊन चालत नाही. पौष्टिक पदार्थांचा अतिरेक केल्यास त्यातली पौष्टिकता राहते बाजूला आणि अपायच जास्त होतात. मोड आलेल्या कडधान्यांच्या बाबतीतही असंच होतं. खरं तर मोड आणणं ही प्रक्रिया म्हणजे धान्य अथवा कडधान्यांमधून पुन्हा […]

अधिक वाचा..

निवांत झोप आणि आरोग्याचं नात

चांगल्या झोपेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. झोप कमी पडणे आणि यामुळे आपल्या दिवसाची उर्जा, उत्पादकता, भावनिक संतुलन तसेच आपल्या वजनावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. कमी झोप झालेली माणसं खूप चिडचिड करतात. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सवयी आणि जीवनशैली यामुळे आपण रात्री अधिक चांगल्या झोपेचा आनंद घेऊ शकता. आपल्या शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्राशी […]

अधिक वाचा..

दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे

दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात; विशेषत: महिलांसाठी. तज्ज्ञ सांगतात, दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत, जे हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करतात. तसेच, दालचिनी मधील वाईट जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म दह्याच्या सुखदायक प्रभावांसह एकत्रितपणे त्वचेचा संपूर्ण पोत सुधारण्यास मदत करू शकतो. परंतु, हे कार्य कसे घडते हे समजून घेणे आणि […]

अधिक वाचा..

रोजच्या आहारात सलग दोन आठवडे हळद वापरल्यास शरीरावर काय परिणाम होईल

हळद हा भारतीय घरात वापरला जाणाऱ्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे. हळदीचा वापर फक्त स्वयंपाक घरात अन्न तयार करताना केला जातो; पण त्याचबरोबर औषधी गुणधर्मांमुळे पारंपरिक विवाह समारंभात आणि सौंदर्य उपचारांसाठीही हळदीचा वापर केला जातो. जर तुम्हाला संधिवात, टेंडोनिटिस व बर्सायटिस यांसारखे ऑटोइम्युन रोग असतील, तर हळदीचे दाहकविरोधी गुणधर्म त्यावर जादूसारखे काम करतात. मूत्रपिंडाचे कार्य सुधारते […]

अधिक वाचा..

घरगुती उपायांचे आरोग्यदायी फायदे आणि मर्यादा जाणून घ्या

आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा. आठपंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते. ताजा आवळा नसताना पूडसुद्धा चालते. आवळा भाजून खाल्ल्याने खोकल्यास लगेच आराम पडतो. अंगावर पित्त उठत असेल तर… कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो. पोटातल्या उष्णतेवर धने उपयुक्त […]

अधिक वाचा..

ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते या ५ सोप्या गोष्टी करा

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये बैठे काम करतात. बैठे काम म्हटलं की तासंतास खुर्चीवर एकाच जागी बसून काम करणे आले. दिवसभरातील काही तास सलग एकाच जागी बसून शरीराची हालचाल न करता काम केल्यास त्याचा त्रास होतो. ऑफिसमध्ये एकाच जागी खुर्चीवर बसून राहिल्याने पाठ आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे यांसारख्या समस्या सतावतात. खुर्चीवर चुकीची बसण्याची पद्धत, हालचालींचा […]

अधिक वाचा..

मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा

सध्याच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण आदी गोष्टींमुळे लोकांना आरोग्य आणि आहाराकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्यामुळे साहजिकच लोकांचा कल फास्ट फूड, जंक फूडकडे असतो. मात्र या पदार्थांमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन गंभीर आजाराचा धोका वाढतो. मेंदू हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण मेंदूवर अवलंबून असतं. त्यामुळे मेंदूचं आरोग्य उत्तम […]

अधिक वाचा..

जेवणानंतर तुम्हीसुद्धा ही चूक करता का

हल्ली युरीक ॲसिड, वजन, काेलेस्ट्रॉल वाढलेल्या व्यक्तींची आकडेवारी खूप दिसून येते. अगदी कमी वयातच अनेकांना हा त्रास होतो. यासाठी बदललेली जीवनशैली देखील खूप जबाबदार आहे. पण तरीही आपण रोज ज्या काही चुका वारंवार करतो, त्यामुळेही तब्येतीवर परिणाम होतोच. त्यापैकीच एक चूक म्हणजे जेवणानंतर गटागट पाणी पिणे. बहुतांश लोक ही चूक करतात. जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा भरपूर पाणी […]

अधिक वाचा..