‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’! शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकारणाचा थरार ६ फेब्रुवारीपासून रुपेरी पडद्यावर

मुंबई: मराठी ऐतिहासिक चित्रपटसृष्टीत आणखी एक भव्य आणि उत्कंठावर्धक पर्व दाखल होत असून, ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक ऐतिहासिक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आणि ऐतिहासिक आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ एक कथा नसून, शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय मांडतो. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच […]

अधिक वाचा..

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७! विकसित भारताचं स्वप्न, पण वर्तमान जगण्याचे प्रश्न अनुत्तरित?

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योग आणि सामाजिक सुरक्षेवर मोठा भर देण्यात आला आहे. ‘२०४७ पर्यंत विकसित भारत’ हे लक्ष्य समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला असला, तरी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित प्रश्न मात्र पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. या […]

अधिक वाचा..

न्याय निवडक आहे का! पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना नोटीसही नाही; अंजली दमानियांचा थेट सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार […]

अधिक वाचा..

अमर रहे… अजितदादा अमर रहे! बाणगंगा तलावात विधीपूर्वक अस्थींचे विसर्जन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज वाळकेश्वर येथील पवित्र बाणगंगा तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.यावेळी “अमर रहे… अमर रहे… अजितदादा अमर रहे…” अशा भावनिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व […]

अधिक वाचा..

मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे ‘दुष्काळ’ इतिहासजमा होणार; निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आमच्या सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या […]

अधिक वाचा..

EpsteinFiles प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ राजीनामा द्यावा; झीनत शबरीन

मुंबई: EpsteinFiles मधील धक्कादायक खुलासे आणि या प्रकरणाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचा आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या प्रकरणाच्या […]

अधिक वाचा..

अजित पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली! अंतर्गत राजकारण कारणीभूत;  बबनराव पाचपुते यांचा दावा

मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला. बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापालिका महापौर पदावर काँग्रेसचाच दावा; दिल्लीत उद्या निर्णायक बैठक; विजय वडेट्टीवार

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्यापूर्वी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीनंतर महापौर पदाबाबत अंतिम तोडगा निघेल, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसावा यासाठी पक्षात हालचाली सुरू आहेत. मात्र काही घडामोडींमुळे […]

अधिक वाचा..

मलंगगडावरील बांधकाम प्रकरणी लवकरच न्यायालयाचा निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर लवकरच अपेक्षित निर्णय लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते. माघी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री मलंगनाथ गड भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य […]

अधिक वाचा..