गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित! धनदांडग्यांना लाभ नाही; चंद्रशेखर बावनकुळे

धाराशिव: राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे शेतात राबूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले […]

अधिक वाचा..

राज्यसभेत भावनिक क्षण! भाजप खासदार सदानंदन मास्टर यांनी सभागृहात कृत्रिम पाय ठेवत मांडली राजकीय हिंसेची वेदना

नवी दिल्ली: सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना एक अभूतपूर्व आणि भावूक घटना घडली. भाजपचे खासदार सी. सदानंदन मास्टर यांनी आपल्या भाषणादरम्यान चक्क आपला कृत्रिम पाय काढून सभागृहातील बाकावर ठेवला. त्यांच्या या कृतीमुळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला, तर नंतर वातावरण अत्यंत भावूक झाले.लोकशाहीचा खरा चेहरा देशासमोर मांडण्यासाठी आपण हे पाऊल […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना वेग; शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द अन्…

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत सूचक वक्तव्ये केली जात आहेत. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या […]

अधिक वाचा..

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाचा कुटुंबियांचा आरोप

भिवंडी: ज्या वयात हातात खेळणी आणि दप्तर असायला हवे, त्या कोवळ्या १२ वर्षांच्या वयात एका निष्पाप मुलाला मृत्यूने कवटाळले. भिवंडीत भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त झालेल्या हामिद खान या चिमुकल्याचा तब्बल २० दिवस मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

सिंचन घोटाळ्याची फाईल आणि रहस्यमय मृत्यू! अजित पवारांच्या मृत्यूवर संसदेत संशयाचा बॉम्ब

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त करत हा मुद्दा थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. इतक्या तडफदार आणि दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होणं ही अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बाब असल्याचं राऊत यांनी सांगितलं. राज्यसभेतील भाषणात संजय राऊत म्हणाले, “मला अजित पवारांची आठवण […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे पाटीलांवर अमोल खुणेचा खळबळजनक आरोप; एसआयटी चौकशी व नार्को टेस्टची मागणी

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत त्यांचा जुना सहकारी आणि घातपाताच्या प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने खळबळजनक दावे केले आहेत. नुकतीच जामिनावर सुटका झाल्यानंतर खुणेने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत थेट मनोज जरांगे पाटील आणि स्वतःची एसआयटी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात […]

अधिक वाचा..

भाजपशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण अशक्य; अजितदादांनंतर नेतृत्वावरही भुजबळांचे मोठे संकेत

नाशिक: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांवर ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट आणि […]

अधिक वाचा..

कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचे नाव; संचालक मंडळाचा सर्वानुमते ठराव

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला आता ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे. शनिवारी (ता. ३१) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीचे बळ असलेले […]

अधिक वाचा..

बजेटनंतर बाजारात अस्थिरता, मात्र पेट्रोल-डिझेल दर स्थिर; सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली: रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. बजेट जाहीर होताच शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार चढ-उतार झाले, तर सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवार (दि. २ फेब्रुवारी) रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर […]

अधिक वाचा..