स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे: उपमुख्यमंत्री अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे मुंबई: मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. स्वामी […]

अधिक वाचा..

मुघलांना जसे धनाजी संताजी दिसायचे तसे फडणविसांना राहुल गांधीच दिसतात

छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

मुंबईत खड्डेमय उड्डाणपुलांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

मुंबई: सोमवार (दि. 25) ऑगस्ट मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो नागरिक येथे प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील बहुतांश उड्डाणपूल व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. हे उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) च्या अखत्यारीत येतात. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीची भीषण कोंडी निर्माण होते. यामुळे दररोज […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी होणार;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या […]

अधिक वाचा..

12 वी नंतर तालुक्याच्या ठिकाणी शिकत असाल तर मिळेल थेट 38,000 रुपये अनुदान

संभाजीनगर: बारावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुवर्णसंधी आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवण यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडून थेट 38,000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. कोणाला मिळेल फायदा इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, […]

अधिक वाचा..

लसणाचं तेल लावण्याचे फायदे 

लसणाचं तेल हा वापरला जाणारा एक घरगुती उपाय आहे. यामध्ये लसूण, हिंग, ओवा, मोहरीचं तेल एकत्र कढवून बनवले जाते. या तेलात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात, जे सांधेदुखी, कंबरदुखी आणि मुरगळलेल्या स्नायूंवर उपयुक्त ठरतात. १) कंबरदुखीवर आराम: या तेलाने मालिश केल्याने कंबरेची दुखणी हळूहळू कमी होतात. 2) गुडघेदुखी कमी होते: हिंग आणि ओव्याचे […]

अधिक वाचा..

छातीवर वार होऊनही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी काढली दुचाकी

संभाजीनगर: आरोपींनी सोळा वर्षांच्या रुद्रच्या छातीवर वार केले होते. परंतु, स्वतःवर झालेल्या वारांची पर्वा न करता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडील प्रमोद यांना वाचविण्यासाठी त्याने घरातून चावी आणत थेट आपली दुचाकी काढली. प्रमोद मागे दुचाकीवर बसले. परंतु गंभीर वार झाल्याने त्यांचा तोल जात होता. घरातून त्यांची पत्नीही कपडा घेऊन आली. तो बांधून रुद्र निघाला. वीस फुटांवर […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे यांच्या मोर्चावर सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसेनानींचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत केला गौरव

महात्मा गांधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते राजगुरु, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय अधिवेशनाला नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजयेंद्र गुप्ता, केंद्रीय पर्यटन मंत्री […]

अधिक वाचा..

सकल मराठा घाटकोपर जनजागृती बाईक रॅली

मुंबई: मुंबई,घाटकोपर,आज रविवार (दि. २४) ऑगस्ट २०२५ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने घाटकोपर विभागात भव्य जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली भटवाडी सिद्धी गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,अमृतनगर सर्कल येथे संपन्न झाली. समाजातील हजारो बंधू-भगिनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाच्या ऐक्याचा आणि एकतेचा भक्कम […]

अधिक वाचा..