आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी; अजित पवार मुंबई: आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये […]

अधिक वाचा..

राज्यात वीज पडून मृत झालेल्या शेतकरी, शेतमजूरांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी 

मुंबई: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा […]

अधिक वाचा..

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी  मुंबई: वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून, पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तातडीने सखोल चौकशी करून […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथे शिवपानंद रस्त्या संदर्भात बैठक संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून सरदवाडी येथे शिवपानंद पूर्वापार शेतवहिवाटीचा रस्त्या संदर्भात सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला मा महाराष्ट्र राज्य शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे यांनी मार्गदर्शन केले. शिवपानंद रस्ते ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून शेवटच्या […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का

मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदती ही सरकार देत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. […]

अधिक वाचा..

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकार

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत साधून त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान […]

अधिक वाचा..

पंढरपूर विकास आराखड्यासाठी 15 कोटी मंजूर केल्याबद्दल डॉ. नीलम गो-हे यांनी शासनाचे मानले आभार 

मुंबई: महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 जून 2025 च्या शासन निर्णया नुसार पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी 2025- 26 या वर्षांमध्ये 15 कोटी एवढा निधी वितरित केला आहे या निधीमधून पंढरपूर मंदिर विकास आराखडा अंतर्गत मंजूर कामावर वर होणारा खर्च करण्यासाठी मोठी संधी मिळालेली आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये राज्य शासनाने हा निधी वितरित केलेला असल्यामुळे मंदिराच्या विकास […]

अधिक वाचा..

राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्यांविरुद्ध १२ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाने दिनांक ११ जुलै २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय अधिस्वीकृती समिती तसेच नऊ विभागीय अधिस्वीकृती समित्यांची बेकायदेशीर व मनमानीपणे स्थापना करण्यात आली होती. या समित्यांच्या स्थापनेला आव्हान देत प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिका क्र. 10070/2023 वर ऑगस्ट व […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी

मुंबई: प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम […]

अधिक वाचा..

राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद

छ. संभाजीनगरसह ‘या’ १५ जिल्ह्यात ३१ हजार कोटींची थकबाकी संभाजीनगर: महाराष्ट्रातील तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी सध्या बॅंकांचे ३१ हजार २५४ कोटी रुपयांचे कर्ज थकवून आहेत. यामुळे या शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे सध्या बंद झाले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. का वाढली थकबाकी कर्जमाफीची आशा: सरकारने विधानसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा..